महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी लोकप्रिय बातम्या

सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यापाठीशी उभे राहायला हवे- ॲड. प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नागपूर/प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे एकूण व्यवहार साधारणतः ६ लाख कोटींच्या आसपास आहेत. भारताने यापैकी एक लाख कोटीचा व्यवहार देशात आणला, तरी देशातील रोजगाराचे प्रमाण दुप्पट होईल. यासाठी हा उद्योग वाढवायचा असेल, तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सांभाळणे महत्त्वाचे आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केले.

कापसाचे क्षेत्र दरवर्षी कमी कमी होत आहे. शेतकरी सोयाबीन आणि इतर पिकांकडे वळत आहे. शेतकरी हा कापसावर आधारित असला पाहिजे, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून त्याला पाठिंबा मिळत नाही. तो पाठिंबा त्याला मिळायला पाहिजे. महाराष्ट्रात १२ कोटी क्विंटल कापूस उत्पादन होते. शेतकऱ्यांना पणन महासंघाकडून ५०० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे शासन अनुदान दिले जात होते. ते बंद आहे, ती पद्धत शासनाने पुन्हा सुरू करावी. शासनाने हे केले नाही, तर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यावर ती पद्धत सुरू करेल, असेही आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, सध्या कापूस वेचायला माणसं मिळत नाहीत. मिळाली, तर त्याचा दर शेतकऱ्यांना परवडत नाही. यावर उपाय काढता येवू शकतो, ती इच्छाशक्ती सरकारने दाखवली पाहिजे. महाराष्ट्रात EGS निधी गोळा केला जातो. तो निधी वर्षाला 32 हजार कोटींच्या आसपास जमा होतो. या निधीच्या माध्यमातून कापूस वेचणाऱ्या माणसाला प्रति क्विंटल 5 रुपये शासनाने द्यायला हवेत.
सरकारने या गोष्टी करण्याची गरज आहे, पण त्यांनी हे केले नाही तर कापसाच्या किंमती संदर्भातील प्रश्न आम्ही सत्तेत आल्यावर प्राधान्याने सोडविणार आहोत. किंमती व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काय द्यायचे आहे, त्याबाबतची मांडणी देखील आम्ही केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

VVPAT स्लीप मोजण्याचा आग्रह धरावा
मागील पाच वर्षांपासून EVM विरोधात मी एकटाच लढत आहे. EVM वरील मतदान ज्याप्रमाणे मोजले जाते. त्याप्रमाणे VVPAT सुद्धा मोजले गेले पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्षांनी न्यायालय आणि निवडणूक आयोगावर दबाव टाकला पाहिजे, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »