महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी

उपलब्ध रोजगारामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य द्या व परप्रांतात गेलेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणी करूनच राज्यात घ्या – मनसे आमदार राजू पाटील

प्रतिनिधी .

कल्याण :  सत्तेतील काही खासदार परप्रांतीयांचे लांगुलचालन करून जाणीवपूर्वक भूमिपुत्रांचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे .तसेच राज्यात  उपलब्ध असलेल्या रोजगारांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन, लॉकडाऊन काळात परप्रांतात गेलेल्या मजुरांची ‘आंतरराज्यीयस्थलांतर कायद्यानुसार नोंदणी करून वैद्यकीय तपासणी करूनच राज्यात परत घेन्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .

     मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनानिवेदन पाठवले असून या निवेदनात त्यांनी राज ठाकरे यांनी  परप्रांतीय पुन्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांची आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यानुसार नोंदणी करन्याची आग्रही भूमिका मांडली होती. परंतु याकडे दुर्लक्षकरून सरकार अशी कोणतीही नोंदणी न करता परप्रांतीयांना पायघड्या घालत असून  महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या रोजगाराबाबत काहीही देणं घेणं नसल्याचा आरोप केला आहे .एकीकडे परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी ट्रेन,बसची मोफत व्यवस्था करण्यात आली तर विविध भागात अडकून पडलेल्या राज्यातीलनागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी इ -पास,फिटनेस सर्टिफिकेट घेऊन चेकपोस्ट वर 12-12 तास थांबून जावे लागल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली

 या भूमिपुत्रांना पुन्हा रोजगारासाठी शहरात आणण्यासाठी सरकार किंवा उद्योजक आताही प्रयत्न करताना दिसत नाहीत, हॉटस्पॉट असलेल्या भागामध्ये थर्मल चेकिंग आणि स्क्रीनींग होत नाही तर दुसरीकडे सरास परप्रांतीय येत आहेत त्यांचे सर्वांचे स्क्रीनींग आणि थर्मल चेकिंग करीत असल्याचार म्हणत असल्याचा खुलासा पाटील यांनी केला .भूमीपुत्राचे होणारे हाल लक्षात घेता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व उद्योगांमध्ये 80 टक्के भूमिपुत्रांना नोकरी देणे बंधनकारक करून त्याची तातडीने अंमलबजावणी करून दुर्लक्ष करणाऱ्या उद्योजकांवर कठोर कारवाई करावी तसेच परप्रांतीय मजूर मुंबईत परतताना त्यांची ‘आंतरराज्यीय स्थलांतर कायधा’नुसार नोंदणी करत  वैद्यकीय तपासणी करावी अशी मागणी केली आहे .

Related Posts
Translate »