महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

श्री विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शन रांगेतील वारकऱ्यांसाठी प्रथमच विश्रांती कक्ष

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

पंढरपूर/प्रतिनिधी – कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना जातीस्तजास्त सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून या अंतर्गत श्री विठ्ठल रूक्मिणीच्या पादस्पर्श दर्शन रांगेतील वारकऱ्यांसाठी चार विश्रांती कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

कार्तिकी यात्रेच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी यांच्यासह विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रा काळात श्री विठ्ठल व रूक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी अठरा ते वीस तासाचा कालावधी लागतो. दर्शन रांगेतील या भाविकांना विश्रांती मिळावी किंवा आजारी वारकऱ्यांना उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने यंदा गोपाळपूर पासून स्मशानभूमि पर्यंतच्या पत्राशेड पर्यंत चार ठिकाणी विश्रांत कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाविकांना उपचार करण्यासाठी डॉक्टरांची देखील नियुक्ती केली जाणार आहे.वयोवृध्द, आजारी भाविक याचा लाभ घेऊ शकणार आहेत. या भाविकांना पुन्हा दर्शन रांगेत जाण्यासाठी टोकन देखील दिले जाणार आहे. तसेच दर्शन रांगेत भाविकांना बसण्यासाठी बाकड्यांची देखील सोय केली जाणार आहे. प्रथमच या सुविधा दिल्यामुळे भाविकांसाठी विठुरायाचे दर्शन सुलभ होणार आहे.

दरम्यान मागील चार वर्षा पासून बंद असणार जनावरांचा बाजार यंदा भरविण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. कोरोना व लम्पी आजारामुळे कार्तिकीमध्ये भरणार प्रसिध्द जनावरांचा बाजार यंदा पासून सुरू होत आहे. वाखरी येथील पालखी तळावर हा बाजार भरणार असून खबरदारीची उपाययोजना म्हणून गाय, बैल यांच्यासाठी वेगळे विभाग करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी जनावरांच्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असून ते जनावरांची तपासणी करूनच बाजारात प्रवेश देणार आहेत.

यासह आषाढी प्रमाणे कार्तिकी वारीमध्ये देखील वारकऱ्यांसाठी ६५ एकर येथे आरोग्य शिबिर होणार आहे. चंद्रभागेत भाविकांच्या स्नानासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून १४ किंवा १५ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »