महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image मुंबई लोकप्रिय बातम्या

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने परेल मध्ये ध्वजरोहन

प्रतिनिधी

मुंबई – प्रजासत्ताकाच्या निमित्ताने देशभक्तांना निव्वळ आदरांजली वाहून चालणार नाही, तर त्यांच्या त्यागाचे स्मरण करावयास हवे.याच त्याग आणि संघर्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि प्रजासत्ताक जन्माला आले.केंद्रात सरकारे काय, येतील जातील!पण अखेर सामांन्याचे व्यापक हित महत्त्वाचे ठरते,असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी येथे कामगारांपुढे बोलताना केले.
प्रतीवर्षाप्रमाणे संघटनेच्या वतीने परेलच्या मजदूर मंझील मधील प्रांगणात ध्वजरोहन समारंभ पार पडला. रा.मि.म.संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे प्रतिनीधी कार्यकर्ते,आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजचे विद्यार्थी या समारंभात सहभागी झाले होत.त्या वेळी ध्वजरोहण सचिन अहिर यांच्या हस्ते पारपडले.
कोरोना महामारीने देशात आणि पर्यायाने आपल्या राज्यात जणू मृत्यूचं तांडव उभं केलं होते,याच्या कटू आठवणी जागवून सचिनभाऊ अहिर आपल्या भाषणात म्हणाले, देशवासियांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी शेतकरी शेतात घाम गाळून शेती पिकवितो.पण त्यालाच आज न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.सरकारने जाचक कायदे मागे घेण्याबाबत आडमुठे धोरण स्वीकारले आहे तर दुसऱ्या बाजुने कामगार हितकारक कायदे मोडीत कढून कामगार वर्गाला विकलांग केले आहे.तेव्हा शेतकरी-कामगार वर्गाला लवकरच न्याय मिळाला पाहिजे,कारण देशाच्या आर्थिक प्रगतीचे ते मुख्य आधार आहेत.
मुंबईतील एनटीसी गिरण्या चालू करण्यावरील यशस्वी लढ्याचा उल्लेख करून सचिन अहिर म्हणाले,आज लॉकडाऊन मधून असंख्य कारखाने बंद पडून बेकारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.पण सघटनेने अनेक कारखान्यांमध्ये चांगल्या पगार वाढीचे करार घडवून आणले,हे कामगारांच्या एकजुटीचे जिवंत उदाहरण आहे.
संघटनेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी गं.दं.आंबेकर यांनी साथीच्या रोगात गिरणगावात घरोघरी जावून होमिओपॅथिक औषधाद्वारे रुग्ण सेवा केली.तोच आदर्श समोर ठेऊन संघटनेने आता भविष्यात कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्याचा विचार केला आहे.कोरोना महामारी अजूनतरी संपुष्ठात आलेली नाही.
राजकारणाच्या बदलाचा उपयोग कामगारांच्या भल्यासाठी करण्यावर भर देवून सचिन अहिर पुढे म्हणाले.,महाराष्ट्रात तीन प्रमुख पक्षाचे सरकार जन्माला आले,ही
गोष्ट कामगार वर्गाच्या उज्वल हिताला पोषक ठरणारी आहे, असेही सचिन अहिर आपल्या भाषणात शेवटी म्हणाले.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत. ध्वज संचालन संघाच्या सेवा दलाचे प्रमुख आकेश पांडे यांनी केले.या प्रसंगी संघटनेचे निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, लक्ष्मणतुपे, शिवाजी काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts
Translate »