महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी शिक्षण

आर्थिक साक्षरतेवरील प्रश्नमंजुषेचे रिझर्व बँकेकडून आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – शालेय विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) नवी दिल्ली येथे, आर्थिक साक्षरतेवरील अखिल भारतीय प्रश्नमंजुषेच्या तिसर्‍या विभागीय स्तरावरील फेरीचे आयोजन केले होते. यामध्ये दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील राज्यस्तरीय विजेत्यांचा सहभाग होता.


प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम ब्लॉक (प्रभाग) स्तरावर आणि त्यानंतर जिल्हा आणि राज्य स्तरावर आयोजित करण्यात आली होती. सरकारी शाळांमधील आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि जागरूकता याबाबत गोडी निर्माण व्हावी, म्हणून त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

या विभागा अंतर्गत येणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 5,132 शाळांमधील अंदाजे 10,264 विद्यार्थ्यांनी प्रभाग स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला. आर्थिक साक्षरता ग्राहकांना माहितीपूर्ण निवड करण्यासाठी सक्षम बनवून आर्थिक समावेशाच्या उद्दिष्टाला पाठबळ देते, ज्यामुळे पर्यायाने त्यांचे आर्थिक कल्याण होते. आर्थिक समावेशकता म्हणजेच, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने सर्वांसाठी परवडणारी आर्थिक सेवा सहज उपलब्ध करणे. यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची आहे. आणि अश्या प्रश्नमंजुषा शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षर होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतील.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »