नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतासारख्या अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेत कोळसा उत्पादन आणि गॅसिफिकेशन सारख्या प्रकल्पात अधिकाधिक गुंतवणूक होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. कोळसा खाणींच्या लिलावाच्या सहाव्या फेरीचे आज त्यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन झाले, त्यावेळी, वित्तमंत्र्यांनी अधोरेखित केले की, सध्या जगासाठी भारत हा गुंतवणुकीचे सर्वात उत्तम आकर्षण ठरला आहे. सध्याच्या केंद्र सरकारचे धोरण सातत्य आणि पारदर्शक प्रक्रिया यामुळे, ऊर्जा क्षेत्रासाठी, होत असलेल्या कोळसा आयातीत 41 टक्क्यांची घट झाली आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले. आजच्या या लिलावप्रक्रियेत खाणींचा लिलाव होणार असून त्याचा थेट लाभ 12 राज्यांना मिळणार आहे. कोळसा क्षेत्राला मुक्त करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने अलीकडेच राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक करत निर्मला सीतारामन म्हणाल्या की, खाण क्षेत्रात झालेल्या सुधारणा आपल्या अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेला सुयोग्य बळ देत आहेत. कोळसा गॅसिफिकेशन आणि व्यावसायिक खाणकामासाठी अर्थमंत्रालयाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही निर्मला सीतारामन यांनी दिली.
यावेळी, कोळसा, खाणकाम आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, कोळशाचा वापर वाढवण्यासाठी, त्यांचे मंत्रालय काही पर्यायी पद्धतीं तपासून बघत आहे. कोळसा गॅसिफिकेशनसाठी वित्त मंत्रालयाने 6000 कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी देऊ केला आहे, तसेच, उत्खनन प्रक्रियेसाठी 250 कोटी रुपये निधी दिला आहे, असे जोशी यांनी सांगितले. आजवरच्या या सर्वात मोठ्या लिलाव प्रक्रियेत, आज अकरा राज्यांतील 141 खाणींचा लिलाव होणार आहे. आधी ज्या खाणींचा लिलाव झाला आहे, तिथे कोळसा उत्पादन सुरु झाले असून या नव्या खाणीतून पुढच्या वर्षी पर्यंत 10 ते 15 दशलक्ष टन कोळसा उत्पादन होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत, यावर्षी, 900 दशलक्ष टन कोळसा उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, असे जोशी यांनी सांगितले.
सहाव्या व्यावसायिक लिलावफेरीत, 133 कोळसा खाणींना लिलावासाठी ठेवले जाणार आहेत. त्यापैकी, 71 खाणी नव्या तर 62 खाणी आधीच्या व्यावसायिक लिलावप्रकियेतून बाहेर पडलेल्या आहेत. त्याशिवाय, पाचव्या व्यावसायिक लिलावप्रक्रियेतील 8 खाणींना दुसऱ्या फेरीत उतरवले जाणार आहे. पाचव्या फेरीत, या सर्व खाणींसाठी केवळ एकच बोली लावली गेली होती. या लिलाव टप्प्याची सुरुवात करत, औष्णिक कोळसा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची कटिबद्धता कोळसा मंत्रालयाने दर्शवली आहे.
ज्या खाणी संरक्षित क्षेत्रात, अभयारण्यात, नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील अधिवासात, किंवा जिथे वनक्षेत्र 40 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अधिक बांधकाम असलेली अशी क्षेत्रे आहेत, त्या खाणींना ह्या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. काही कोळसा खाणींच्या ब्लॉक सीमा, (बाह्य सीमा) जिथे घनदाट वनक्षेत्र आणि अधिवास आहे, किंवा संवेदनशील बांधकाम आहे, अशा क्षेत्रांच्या सीमांचे रेखांकन, त्यासंदर्भात हितसंबंधी गटांनी दिलेले सल्ले आणि सूचनांच्या आधारावर बदलण्यात आले आहे. जेणेकरून, बोली लावणाऱ्या कंपन्यांना लिलावात सहभागी होण्यात रस येऊ शकेल.
लिलाव करण्यात येणाऱ्या खाणी झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, तामिळनाडू आणि बिहार या कोळसा/लिग्नाइट असलेल्या राज्यांमध्ये पसरलेल्या आहेत.
Related Posts
-
२७ फेब्रुवारीपासून कोळसा मंत्रालय व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव करणार सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोळसा मंत्रालयाने 03…
-
व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाला ३० जानेवारी पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. केंद्रीय कोळसा मंत्रालयाने 141 कोळसा खाणींसाठी 3 नोव्हेंबर 2022 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाची सहावी फेरी आणि त्यासाठीच्या दुसऱ्या प्रयत्नाला सुरू केली होती. उद्योग क्षेत्राकडून असलेली कोळशाची मागणी लक्षात घेऊन तसेच व्यवसाय सुलभतेला चालना देण्याच्या दृष्टीने मंत्रालयाने यापुढे, परफॉर्मन्स बँक गॅरंटीसाठीची पहिली तपासणी उजळणी ही, संबंधीत खाणी खुल्या करण्याची परवानगी दिल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आता निविदेशी निगडीत कागदपत्रांमधील तरतुदींनुसार, यशस्वीरित्या लिलाव झालेल्या प्रत्येक कोळसा खाणीसाठी, सादर कराव्या लागणाऱ्या परफॉर्मन्स बँक गॅरंटीमध्ये, दरवर्षी त्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिल महिन्यात राष्ट्रीय कोळसा निर्देशांकाच्या आधारे तपासणी करून सुधारणा केली जाणार आहे. 2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणींसाठी पहिला लिलाव सुरू झाल्यापासून, राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांत दुप्पटीने वाढ झाली आहे, ही बाब लक्षात घेऊनच परफॉर्मन्स बँक गॅरंटीमध्ये शिथीलता मिळावी यासाठी, कोळसा मंत्रालयाला उद्योगक्षेत्राकडून असंख्य निवेदने प्राप्त झाली आहेत. राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांत झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे, ज्या निवीदा यशस्वीपणे स्विकारल्या गेल्या आहेत आणि कार्यवाहीच्या बाबतीत त्यांच्या खाणी या प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याआधीच्या टप्प्यापर्यंत पोहचल्या आहेत, अशांवरचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, आणि या सगळ्यामुळे खाणी कार्यान्वित करण्याच्या कामांसाठी निधी कसा उपलब्ध करावा, ही नवी समस्या निर्माण झाली असल्याचे या निवेदनांमध्ये म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खाणी कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अशा निविदाधारकांवरील आर्थिक भार कमी करण्याकरता गुंतवणूकदाराभिमुख उपक्रम वा उपाययोजना राबवावी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. याद्वारे व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावात निविदाधारकांचा सहभागही वाढेल असे अपेक्षीत आहे. याच अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या लिलाव फेरीत ही नवी सुधारणा लागू करता यावी यासाठी कोळसा मंत्रालयाने, लिलावासाठीची अंतिम तारखेला मुदतवाढ देत, ती आता 13 जानेवारी 2023 ऐवजी 30 जानेवारी 2023 अशी केली आहे.
-
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड माल्पास यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. वॉशिंग्टन- केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार…
-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते डीआरआयच्या ६५ व्या स्थापना दिन सोहोळ्याचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अप्रत्यक्ष कर…
-
कोळसा मंत्रालयाचा कोळसा जोडणीचा सुसूत्रीकरण नावाचा धोरणात्मक उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
कोळसा वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी कोळसा मंत्रालयाचा पुढाकार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
कोळसा मंत्रालयाने बंदिस्त खाणींतील कोळसा उत्पादनाचा घेतला आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ज्या कोळसा ब्लॉक्सनी…
-
कोळसा मंत्रालयाकडून वृक्षारोपण मोहीम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
विंचूर,निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू, लासलगावला गुरुवारी होणार लिलाव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - विंचूर बाजार समिती पाठोपाठ…
-
कांद्याचे लिलाव सलग तीन दिवसांपासून बंद
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्राकडून कांद्याच्या…
-
दिल्लीत १६-१७ ऑक्टोबरला पहिली राष्ट्रीय कोळसा परिषद आणि प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - कोळसा मंत्रालयाच्या सहकार्याने…
-
व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव…
-
लासलगावात पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव सुरु ; कांद्याला सरासरी २१५० भाव
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र सरकारने…
-
शिवसेना शिंदे गटात कार्यकर्त्यांसोबत मानहाणी होते-निर्मला प्रभावळकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा निवडणूक शेवटच्या…
-
ऑक्टोबर मध्ये देशातील कोळसा उत्पादनात १८ टक्के वाढ,उत्पादन ४४८ दशलक्ष टनांवर पोहोचले
नवी दिल्ली/प्रतिनिधी - या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात देशातील एकूण कोळसा…
-
गव्हाच्या विक्रीसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून ५ वा लिलाव
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/ प्रतिनिधी- देशात गहू आणि…
-
एप्रिल २०२२ मध्ये कोळसा उत्पादन ६६१.५४ लाख टनांपयेंत पोहचले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - एप्रिल 2022 मध्ये…
-
कोळसा मंत्रालय अतिरिक्त १९ फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रकल्प हाती घेणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोळसा मंत्रालय कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि एससीसीएल साठी 330 दशलक्ष टन (एमटी) क्षमतेचे अतिरिक्त 19 फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी (एफएमसी) प्रकल्प हाती घेणार आहे आणि हे प्रकल्प आर्थिक वर्ष 26-27 पर्यंत कार्यान्वित होतील. मंत्रालयाने यापूर्वीच 18000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्रतिवर्ष 526 दशलक्ष टन क्षमतेचे 55 एफएमसी प्रकल्प (44 – सीआयएल, 5- एससीसीएल आणि 3 – एनएलसीआयएल) हाती घेतले आहेत. त्यापैकी प्रतिवर्ष 95.5 दशलक्ष टन क्षमतेचे आठ प्रकल्प (6-सीआयएल आणि 2एससीसीएल) कार्यान्वित झाले आहेत आणि उर्वरित आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कार्यान्वित होतील. भविष्यात कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही कोळसा उत्खनन सुनिश्चित करण्यासाठी, मंत्रालय राष्ट्रीय कोळसा लॉजिस्टिक योजनेच्या विकासावर काम करत आहे ज्यात कोळसा खाणींजवळील रेल्वे मार्गांद्वारे फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि कोळसा क्षेत्रांमध्ये रेल्वे नेटवर्क मजबूत करणे समाविष्ट आहे. कोळसा मंत्रालयाने आर्थिक वर्ष 25 पर्यंत 1.31 अब्ज टन कोळसा आणि आर्थिक वर्ष 30 मध्ये 1.5 अब्ज टन उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या संदर्भात, किफायतशीर, जलद आणि पर्यावरणस्नेही कोळसा वाहतुकीचा विकास महत्त्वाचा आहे. खाणींमधील कोळशाची रस्ते वाहतूक टाळण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्याकरिता मंत्रालयाने धोरण तयार केले आहे आणि एफएमसी प्रकल्पांतर्गत यांत्रिक कोळसा वाहतूक आणि लोडिंग सिस्टम अद्ययावत करण्यासाठी पावले उचलली आहेत. जलद माल भरण्याची व्यवस्था असलेल्या कोळसा व्यवस्थापन सयंत्र (CHPs) आणि एसआयएलओ सह कोळशाचे तुकडे करणे, त्यांना निर्धारित आकार देणे आणि संगणकाच्या मदतीने कोळसा भरणे हे फायदे असतील. वर्ष 202021 मध्ये नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्थेमार्फत (NEERI), अभ्यास करण्यात आला.NEERI अहवालाने वार्षिक कार्बन उत्सर्जन बचत, ट्रकच्या फेऱ्यांची घनता कमी करणे आणि प्रति वर्ष 2100 कोटी रुपयांची डिझेल बचत दर्शवली आहे.
-
शासनाच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांचा ५ सप्टेंबरला लिलाव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आठ वर्षे…
-
खनिज सवलत नियमावली १९६० मधल्या ६८ तरतुदी कोळसा मंत्रालयाने अपराध श्रेणीतून केल्या कमी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय कोळसा मंत्रालयाने…
-
वाळू गटांचे लिलाव सुरु करण्याचे महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासनाने वाळू उत्खनन…
-
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बारा दिवस कांद्याचे तर नऊ दिवस धान्याचे लिलाव बंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी - आशिया खंडातील कांद्याची…
-
एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान ऊर्जा क्षेत्राद्वारे कोळसा आयातीत २२.७३ मेट्रिक टनांपर्यंत घट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - देशांतर्गत कोळसा उत्पादन…
-
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी-जागतिक बँक (आयएमएफ-डब्ल्यूबी) स्प्रिंग…