महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

अखेर दोन दिवसांचा जलप्रवास करून T – 80 युद्धनौका कल्याणच्या खाडी किनारी दाखल

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार ऐतिहासिक कल्याणच्या खाडी किनारी उभारले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कर्तुत्व, दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष म्हणून भारतीय नौदलाच्या या निवृत्त युद्धनौकेचे स्मारक हे कल्याणच्या खाडी किनारी उभारले जात आहे.

भारतीय नौदलात आपल्या पराक्रमी शौर्याद्वारे मानाचे स्थान मिळवलेली T80 ही युद्ध नौका अखेर कल्याणच्या खाडी किनारी दाखल झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमधून जलमार्गाने या युद्धनौकेचा कल्याणच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी होणाऱ्या प्रस्तावित स्मारकासाठी ही युद्ध नौका केडीएमसीकडून कल्याणात आणली गेली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तत्कालीनआयुक्त. ज्यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास सांगणाऱ्या या आरमार स्मारक प्रकल्पाची पायाभरणी झाली. मात्र डॉ. सुर्यवंशी यांनी स्वतः जातीने लक्ष घालत केलेल्या पाठपुराव्यामुळे अत्यंत कमी वेळेत हा प्रकल्प आकारास येत आहे.

भारतीय नौदलातील T 80 ही युद्धनौका कल्याणात स्मारक स्वरूपात विराजमान करण्याबाबत गेल्या नोव्हेंबर महिन्यात भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन (SKDCL) यांच्यात करार झाला होता. त्यानूसार दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या कुलाबा येथील नौदल डॉकयार्डमधून कल्याणच्या दिशेने रवाना झाली होती. यावेळी रिअर ॲडमिरल ए. एन. प्रमोद, कमांडर जीलेट कोशी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, तत्कालीन केडीएमसी आयुक्त आणि विद्यमान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, शहर अभियंता अर्जुन अहिरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ही युद्धनौका कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी स्मारक स्वरूपात विराजमान होणार आहे.
त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास हा तरुण पिढीसाठी मार्गदर्शक तर आहेच तसेच या स्मारकातून नविन पिढ्यांना प्रेरणा मिळेल व देशाच्या विकासासाठी तेही आपले योगदान देतील अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×