नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नाशिक/प्रतिनिधी – कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी अचानक कांदा निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने कांदा निर्यात बंदी तातडीने उठवण्यात यावी या मागणीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येवला तालुक्यातील कातरणी येथील शेतकरी गोरख वाल्मीक संत आमरण उपोषणाला बसले आहे.
जोपर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असून केंद्राचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण होय अशी प्रखर टीका आमरण उपोषणकर्ते गोरख संत यांनी केली.