महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी महत्वाच्या बातम्या

बाजारीच्या उत्पन्नात घट होत असल्याने शेतकरी हवालदिल

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – गावाकडे गेल्यावर तुम्ही बाजरीची भाकरी आणि ठेचा खल्ला नाही असं कधी झालं नसेल. आहाराच्या दृष्टीने महत्वाची असणाऱ्या बाजरीचा उपयोग भाकरी, नुडल्स, आंबील, लाह्या व इडली या विविध स्वरुपात केला जातो. शक्यतो बाजरीची लागवड शेतकरी उन्हाळ्यातच करतात. कारण उन्हाळ्यात योग्य असे हवामान आणि पुरक प्रमाणात पानी मिळाल्यामुळे बाजरीची लागवड चांगली होते. पण बाजरीची काढणी जवळ येई पर्यंत शेतकऱ्याला डोळ्यात तेल घालून आपल्या बाजरीची काळजी घ्यावी लागते. कारण बाजरीला दाणे यायला सुरुवात झाली कि ती राणातल्या पाखरांचे अन्न बनते.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये पावसाळी बाजरीनंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीची लागवड केली आहे. शेतात मुबलक प्रमाणात पाणी असल्याने उन्हाळी बाजरीचे उत्पन्न चांगले येते. त्यामुळे शेतकऱ्याने उन्हाळी बाजरीची लागवड केली आहे. यावर्षी हवामान बदल त्याचबरोबर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे बाजरीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाळी बाजरी काढणीला सुरूवात झाली आहे. बाजरी काढणीनंतर मशीनच्या साहाय्याने मळणी सुरु आहे. बाजरीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्याने लागवडीसाठी लागलेला खर्च तरी निघतो की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. बाजारपेठेमध्ये बाजरीला समाधानकारक भाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

Related Posts
Translate »