महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

चंद्रभागा नदीत घाणीचे साम्राज्य; भाविकांनी व्यक्त केली नाराजी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

पंढरपूर/प्रतिनिधी – जसे पंढरपूरला भूवैकुंठ म्हटले जाते तसेच संतांनी चंद्रभागा नदीचा उल्लेख आपल्या अभंगातुन बहीण असा केला आहे. चंद्रभागा स्नान म्हणजे वारकरी सांप्रदायात पुण्यकर्म समजले जाते. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना मात्र इथे आल्यानंतर चंद्रभागेचे जे बकाल रूप दिसते ते पाहून धक्का बसतो. दरवेळी आषाढी यात्रेपूर्वी आढावा बैठका घेतल्या जातात. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वारकरी प्रतिनिधी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात पडलेले घाणीचे ढिगारे, नदीच्या पाण्यास येत असेलली दुर्गंधी आणि कचऱ्याचे साम्राज्य या बाबत तक्रार करतात. वारी पूर्वी दोन चार दिवस स्वछता केली जाते, पुन्हा परिस्थिती जैसे थे तशीच राहते. प्रशासनाच्या या उदासीनतेवर येणाऱ्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपण आता चंद्रभागेच्या वाळवंटात आलो आहोत आणि चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि नदीचे पात्र याची बकाल अवस्था पाहून नक्कीच कुठल्याही भाविकाला,पंढरपूरकराला वेदना झाल्याशिवाय राहणार नाही.नमामी चंद्रभागा या योजनेचा गवगवा येथील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केला गेला मात्र त्याची अमंलबजावणी मात्र होताना दिसून येत नाही.

आज उजनीतून पाणी सोडले आहे. चार दिवसांनी हे पाणी पंढरपुरात पोहाचेल आणि चंद्रभागा नदीतील हि घाण वाहून जात पुढच्या बंधाऱ्यांच्या ठिकाणी साचून राहणार आहे.आणि पुढील आठ पंधरा दिवसासाठी चंद्रभागा स्वच्छ झाली म्हणून समाधान व्यक्त होईल पण यावर कायम स्वरूपी तोडगा केव्हा निघणार की हा प्रश्न कायम राहणार असा सवाल येथे येणाऱ्या भाविकांनी विचारला आहे.

Related Posts
Translate »