महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी चर्चेची बातमी

फुलांची मागणी घटल्याने फूल उत्पादक शेतकरी संकटात

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – राज्यातील बहुतांश शेतकरी वर्ग हा पारंपारिक पिकांबरोबरच फूलशेती मोठ्या प्रमाणावर करतो. लग्नसराई आणि सन-उत्सव यामुळे झेंडू, मोगरा, गुलाब, तसेच चाफा, इ फुलांना बाजारात मोठी मागणी असते. फूल उत्पादक शेतकरी डोळ्यात तेल घालून या फुलांची निगा राखतात. कारण वातावरणातील बदल आणि किटकांमुळे फुलशेतीवर अनेक संकटे ओढावतात. पण जळगाव जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यावर आता वेगळेच संकट आले आहे. ज्यामुळे येत्या काळात त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

लग्नसराई सुरू होती त्यावेळेस फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. लग्नाची धामधूम कमी झाल्याने बाजारात आता फुलांची मागणी देखील कमी झाली आहे. त्यामुळे फुलांच्या किमतीत घसरण झाल्याचे चित्र आहे. फुलांना 80 रुपये ते 100 रुपये पर्यंतचा भाव मिळत होता. त्यामुळे शेतकरी राजाही खुश होता. परंतु आता लग्नसराई बंद झाल्याने फुलांची मागणी कमी आहे. त्यामुळे फुलांना 40 रुपये ते 50 रुपये भाव मिळत आहे. अशी माहिती फूल उत्पादक शेतकरी नामदेव माळी यांनी दिली. लखलखत्या उन्हामध्ये फूले तोडून शेतकरी विक्रीसाठी ठेवत आहे. परंतु भाव कमी मिळत असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्याच्या पदरी निराशा येणार आली आहे.

Related Posts
Translate »