महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर लोकप्रिय बातम्या

माहिम केळवे धरण गळतीबाबत जिल्हा प्रशासनाने वेळीच केली उपाययोजना

नेशन न्युज मराठी टीम.

पालघर– माहिम केळवे धरण ढासळल्यामुळे खालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच आवश्यकतेनुसार एनडीआरएफची टीम सुद्धा तैनात करण्यात आली होती. परिसरातील गावामधील नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारीसुद्धा जिल्हा प्रशासनाने केली होती. या उपाययोजना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या देखरेखीखाली गळती प्रतिबंधक कामे वेळीच जिल्हा प्रशासनाने केल्यामुळे होणारा अनर्थ टाळता आला आहे असे कृषी, माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

झांझरोळी गावा जवळील माहिम केळवे लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेल्या धरणात गळती लागली होती. या गळती  प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामाची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी करुन वरीष्ठ अधिकारी यांना सूचना केल्या त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

धरणाची गळती होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनला आपातकालीन उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या देखरेखेखाली गळती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून भविष्यात धरण अधिक सुरक्षित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

धरणामध्ये सद्यस्थितीत 2.46 द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध असून गळती प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक 0.50 द.ल.घ्‍.मी. पिण्याच्या पाण्याचा पाणीसाठा राखीव ठेवून 2.00 द.ल.घ.मी. पाणीसाठा मार्च अखेरपर्यंत कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत धरणाच्या अन्य भागातून पाणी सोडण्याचा पर्यायाचा अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »