महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ganapati इतर लोकप्रिय बातम्या

कोकणातील गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज

नेशन न्यूज मराठी टीम.

रत्नागिरी / प्रतिनिधी – गणेशोत्सवासाठी तब्बल १३ लाख चाकरमानी कोकणात दाखल होणार असून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्हयात १५ मदत केंद्र उभारण्यात आले असून १२७१ पोलीस कर्मचारी तर ८६ अधिकारी हे या काळात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही तक्रारी अथवा मदतीसाठी ११२ वर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेव्दारे केले आहे.

कोकणातील गणेशोत्सव हा मोठ्या भक्तिभावाने आणि शांततेत साजरा केला जातो, या महत्त्वाच्या उत्सवासाठी लाखों चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. यंदा १३ लाख चाकरमानी दाखल होणार आहेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य नियोजन केले असून सर्व विभागांच्या यासंदर्भात बैठकाही घेण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून गावोगावी जाऊन बैठका घेतल्या जात आहेत, जवळपास ३१०० बसेस चाकरमान्यांना घेऊन शनिवार पासून जिल्हयात दाखल होणार आहेत. यासाठी एसटी महामंडळ, पोलीस दल, महसूल विभागाकडून महामार्गावर मदत केंद्रही उभारण्यात आले आहेत.

१३ ठिकाणी शांतता कमिटीची बैठक ही पोलीस दलाने यशस्वीपणे घेतल्या असल्याचीही माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.रत्नागिरी शहरात प्रीपेड रिक्षा वाहतूक प्रायोगिक तत्वावर सुरू करणार,गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांकडून अनावश्यक जादा भाडे आकारले जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने रिक्षा संघटना ची बैठक घेतली, मीटर प्रमाणे भाडे आकारण्याची सूचना करण्यात आली आहे, या बैठकीला आरटीओ विभागाचे अधिकारी ही उपस्थित होते. तसेच रेल्वे स्टेशन येथे लाखो चाकरमानी दाखल होणार असल्याने शहर बसेसच्या फेऱ्यादेखील वाढवण्याच्या सूचना प्रशासनाने एसटी विभागाला दिल्या आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »