महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याणात तलाव स्वच्छ करणाऱ्या रोबोटिक मशीनचे प्रात्यक्षिक

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – सध्या ए आय म्हणजेच आर्टिफिशयल इंटेलिजन्स वर आधारित तंत्रज्ञानाने जगभरात धुमाकूळ घातला आहे, या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या रोबोट आणि रोबोटिक मशीनची निर्मिती केली जात आहे, अशाच एका तलाव स्वच्छ करणाऱ्या रोबोटिक मशीनचे आज कल्याणात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते,

हे मशीन भारतात पहिल्यांदाच दाखल झाले असून मुंबई महापालिकेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, कल्याण पश्चिमेच्या गौरी पाडा तलावात हे मशीन सोडून त्याद्वारे तलावात पडलेल्या कचऱ्याची स्वच्छता कशी केली जाऊ शकते, याचा डेमो कंपनीतर्फे दाखविण्यात आला. वजनाला अतिशय हलके असणारे हे मशीन जॉय स्टिक किंवा जीपीएस कनेक्टेड रिमोटमार्फत चालवले जाऊ शकते या मशीनमध्ये उच्च क्षमतेचा कॅमेरा बसवण्यात आला असून त्याद्वारे तलावात दूरवर पसरलेला कचराही सहजपणे गोळा केला जाऊ शकतो तर एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हे तंत्रज्ञान असल्याने ऑटो प्रोग्रॅम केल्यानंतर कोणत्याही व्यक्ती विना हे मशीन तलावातील कचरा गोळा करत असल्याचे यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले,
फ्रान्समधील आयडीज या कंपनीने जेलीफिश बोट नामक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणाऱ्या या रोबोटिक मशीनची निर्मिती केली आहे,

दरम्यान केडीएमसी आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी स्वतः जॉयस्टीक द्वारे हे मशीन चालून पाहिले, आणि या मशीनची आणि त्याच्या कामाची प्रशंसा केली, परंतु या मशीनची किंमत पाहता महापालिकेसाठी ही अतिशय खर्चिक बाब ठरू शकते असेही या कंपनी प्रतिनिधींना त्यांनी स्पष्ट केले,
यावेळी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, ब प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते,

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »