महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

कल्याण मधील दुर्गाडी खाडीत एनडीआरएफची प्रात्यक्षिके

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण  – मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात पूर परिस्थिती उद्भवते. या पार्शवभूमीवर कल्याण मध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. २५ जणांचे हे पथक अत्याधुनिक सामुग्रिने सज्ज आहे. आज कल्याण दुर्गाडी खाडीत या पथकाने प्रात्यक्षिके केली. या एनडीआरएफच्या टिमचे पथक प्रमुख निरीक्षक राजेश यावले यांनी आपल्या टीमसह  आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करणार याबाबत प्रत्याक्षिक सादर करण्यात आली.

मागील काही दिवसापासून ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पूर प्रवणतेचा विचार करता पुरपरिस्थिती,  इमारत दरड कोसळणे , वाहतूक कोंडी तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीतीत आपत्तींना सामोरे जाण्यासाठी  मान्सून कालावधी करीता, बचावकार्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संचालक यांच्यामार्फत ठाणे जिल्ह्यासाठी एनडीआरएफच्या दोन पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्यापैकी २५ जवानांची एक टीम  कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर व भिवंडी साठी देण्यात आली आहे. या टीम सोबत त्यांच्या सोबत ५ बोट, लाईफ बॉय, लाईफ जॅकेट यासह पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांना वाचविण्यासाठी जे जे साहित्य आवश्यक आहे ते आमच्याकडे उपलब्ध असल्याची माहिती  एनडीआरएफच्या टिमचे पथक प्रमुख निरीक्षक राजेश यावले यांनी दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »