महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

भिवंडीत लसीकरणात स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्याची मागणी

भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीतील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी करण्यात येणारे लसीकरण सध्या लसींच्या अभावामुळे बंद करण्यात आले असल्याने भिवंडी ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्येत वाढ झाली आहे. मात्र लसीकरण सुरु असतांना ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ठाणे मुंबई व आजूबाजूच्या शहरातील नागरिक येऊन लसीकरण करत असल्याची बाब अनेक वेळा समोर आली असून स्थानिक ग्रामीण भागातील नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात यावी व ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच इतर शहरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लस द्यावी अशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य ब बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे बाळ्या मामा यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.            

राज्य शासनामार्फत लसीकरणासाठी ऑनलाईन प्रक्रिया राज्यात राबवली जात आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्मार्ट फोन, इंटरनेट, मोबाईल नेटवर्क याच्या अभावी प्रत्येकाला नोंद करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना कोरोनाच्या लसीकरणापासून वंचित रहावे लागत आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये शहरी भागातील लोक लसिचे ऑनलाईन रजिस्टर करून मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना लासीकरणासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून सध्या ग्रामीण भागातील लससाठा देखील संपुष्टात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लासीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील स्थानिक नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरती त्यांच्या आधारकार्डच्यामार्फत ऑफलाईन प्रक्रिया राबवून प्रथम प्राधान्य देऊन, ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त लसीकरणाची संधी निर्माण करून लाभ मिळवून द्यावा अशी मागणी माजी सभापती सुरेश म्हात्रे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »