महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image व्हिडिओ

काकोळे धरणाच्या संरक्षण भिंतीला तडे,अंबरनाथ,उल्हासनगर ग्रामीण भागासाठी धोक्याची घंटा? प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी.

अंबरनाथ – तालुक्यातील काकोळे गावाच्या हद्दीत असलेल्या ब्रिटिश कालीन धरणाच्या संरक्षण भिंतीला तडे गेले आहेत.सध्या या भिंती मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने सध्या आजूबाजूच्या गावांसाठी हा धोक्याचा इशारा असू शकतो.

ब्रिटिश सरकारने कल्याण जवळच्या दुर्गम अश्या काकोळे गावातुन वाहणाऱ्या वालधुनी नदीवर धरण बांधले होते. लालूप्रसाद यादव यांनी याच धरणातील पाण्यावर रेलनीर प्रकल्प उभारून रेल्वेला कोट्यवधींचा फायदा करून दिला. या दिडशे वर्ष जुन्या धरणाच्या मोठ्या दगडी संरक्षण भिंतीला दोन वर्षांपूर्वी तडे गेले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे निष्काशन होत होते.स्थानिक ग्रामस्थांनी ही बाब तहसीलदारांपासून ते पंतप्रधानांन पर्यंत पोहचवली आहे.मात्र सध्या  कोणत्याही यंत्रणेने लक्ष दिले नसल्याने अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या गावांना देखील ही संरक्षण भिंत धोक्याची घंटा देत आहे. या धरणाची संरक्षण भिंत ही मागील वर्षी देखील फुटली होती,मात्र ग्रामस्थांच्या सतरकर्तेमुळे भिंत बांधण्यात भर पावसात यश आले होते.मात्र यंदा पाणी गळतीचे प्रमाण अधिक असल्याने धोक्याची घंटा अधिक निर्माण झाली आहे.मागील वर्षी संरक्षण भिंत फुटल्यानंतर शासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या धरण क्षेत्राचा दौरा करून तातडीने डागडुजी करून संरक्षण भिंत नव्याने उभारण्याचे अश्वासन ग्रामस्थांना दिले होते.त्यावेळी जिथे भिंत फुटली तो भाग तात्पुरता दुरुस्त करण्यात आला.मात्र सम्पूर्ण भिंतीची डागडुजी झालीच नाही.आता या ग्रामस्थांना पुन्हा धोका या धरणाने निर्माण झाल्याचे ग्रामस्थ नरेेश गायकर यांनी सांगितले.आतातरी प्रशासन लक्ष देईल का हे पाहावे लागेल..

Related Posts
Translate »