महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

”बंध” विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवाना कोरोनाचा फटका

मिलिंद जाधव

भिवंडी – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी होऊ नये म्हणून दर रविवारी पडघा मुख्य बाजारपेठ बंद असून रविवारी पडघा लगतच असलेल्या नाशिक महामार्गावर आठवडा बाजार भरला होता. या पडघा आठवडा बाजारात ”बंध” व्यावसायिकांना कोरोनाचा फटका जाणवला असून ”बंध” विक्रीसाठी आलेल्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. भिवंडी तालुक्यातील पडघा हे ठिकाण अनेक खेड्या गावांचे केंद्रबिंदु म्हणून मानले जाते. ग्रामीण भागात मुख्य व्यवसाय शेती म्हणून आढळून येतो. ३ ते ४ महिन्याच्या कालावधीत धान्य पिकवले जाते. शेतीच नुकतच पिक आले असून लवकरच भात कापणीला सुरुवात होणार आहे. त्याच भाताचे भारे बांधण्यासाठी ग्रामीण भागात बाबुं पासुन बनविलेल्या बंधचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. बांबु ओला असतांना त्याला ठेचून ४ ते ५ दिवस सुकवून “बंध” बाजारात विकायला आणला जातो. पडघा आठवडा बाजारात नुकतेच “बंध” विक्रीसाठी आले असून पडघा परिसरातील शेतकऱ्यांनी बंध खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी पाच्छापूर,उबरखांड, नेवाडा, खातीवली, सारमाल, डोहोळे,पडघा तर आदी ठिकाणाहुन आदिवासी महिला व पुरुष बंध विक्रीसाठी आले होते. बंध १०० ते १५० रुपये शेकडा असून एक बंध प्रत्येकी एक ते दीड रुपयाला पडतो. असे विक्रीसाठी आलेला प्रत्येक एक व्यक्ती १००० ते १५०० रुपये कमवितो असे बंध विक्रेत्यांनी बोलतांना सांगितले. रोजचा खर्च सुटेल या आशेवर आदिवासी बांधव शेती बरोबरच वर्षांतून एकदाच आणि ७ ते ८ दिवसाचा हा व्यवसाय करतात. सध्या कोरोनाच्या संकटामुळे दरवर्षी प्रमाणे बंधची चांगली विक्री झाली नाही, म्हणून बंध विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवाच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली.

Related Posts
Translate »