महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी मुंबई

बीएमसीचे ५०% उपस्थितीचे परिपत्रक कर्मचाऱ्यामध्ये संसर्ग वाढण्याची भीती.

प्रतिनिधी .

मुंबई – राज्यात दिवसन दिवस कोरोना संसर्ग रुग्ण वाढत आहे. त्यात मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासनाने अत्यावशक/ आपत्कालीन सेवा वगळता सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना एक दिवसाआड सेवेत बोलावून ५० टक्के उपस्थिती राखण्यास मार्च महिन्यात परिपत्रक जारी केले होते. मात्र हे परिपत्रक प्रशासनाने कायम ठेवले असून आता पुन्हा या परिपत्रकाचा आधार घेत सुधारित परिपत्रक जारी केले आहे. ज्या कर्मचाऱ्याची उपस्थिती ५० टक्के असेल त्याचाच पूर्ण पगार निघेल आणि ज्याची उपस्थिती ५० टक्क्यापेक्षा कमी असेल त्याचे वेतन उपस्थितीनुसार काढले जाईल. म्हणजेच आता कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात केली जाईल. आधीच कोरोनामुळे घरी आडकून पडलेल्या अनेक कर्मचाऱ्यान मध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परीस्थितीमुळे प्रवाशाच्या सर्वच यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत.इच्छा असून सुद्धा कर्मचारी कामवर येऊ शकत नाही. प्रशासनानेजी प्रवासाची सोय केली आहे ती आधिच्याच कर्मचाऱ्याना आपुरी पडत आहे. त्यात कर्मचारी गर्दी करून भरले जातात. गर्दी मुळे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे, त्यामुळे प्रशासन एकीकडे घरात बसण्याची विनंती करीत आहे. आणि दुसरी कडे मुंबई महापालिकेने ५०टक्के कर्मचाऱ्यानी उपस्थित राहावे हे परिपत्रक काढले आहे. जे कर्मचारी मुलुंड,बोरीवली,मानखुर्दच्या पुढे राहतात. अशा कर्मचाऱ्याना प्रवासाची साधने नसल्याने सेवेत उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे कर्मचारी संभ्रमात आहे कराव तरी काय? कामावर येणार तरी कसे असा सवाल कर्मचाऱ्यान मध्ये आहे. आदीच बेस्ट बस मध्ये आपत्काळीन सेवेतील कामगार व कर्मचारी याची गर्दी होत असताना त्यात सामाजिक अंतराचा कोणताही  नियम पळताना दिसून येत नाही. जर अनखीन  पालिका कर्मचाऱ्याची भर त्यात पडली तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.      

Related Posts
Translate »