महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

महाराष्ट्रात निघणार कॉंग्रेसची जनसंवााद पदयात्रा

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनिधी – गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने या देशाची जी माती केली, ते दाखवून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षातर्फे 3 सप्टेंबर पासून जनसंवााद पदयात्रा सुरू होत आहे. असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे म्हणाले. ही यात्रा प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहराच्या भागात जाणार आहे.

नरेंद्र मोदीच्या सरकारने संविधानिक व्यवस्थेला संपवलं, या देशाला बेरोजगारांचा देश बनवला, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला परावृत्त केलं. महागाई वाढवली, मुठभर लोकांसाठी हा देश चालवला जात आहे. यांच्यातील एकाने सांगितलं डॉ. बाबासाहेबांनी घटना लिहिलीच नाही अशा थोर नेत्यांचे अपमान करण्याचा पाप हे सरकार करते आहे. या सगळ्या गोष्टीची जनतेमध्ये चीड आहे या त्यांच्या भावना समजून काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. काँग्रेस ही देशाच्या संविधानिक व्यवस्थेला न्याय देणारी पार्टी आहे त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या पाठी उभे राहण्याचा संकल्प या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे.

या सरकारच्या योजना कशा बोगस आहेत आणि जनतेला कसं लुटून व्यापारीदृष्टीनं व्यापारी लोकांना मोठं केलं आहे. नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असताना जाण्यास बंदी होती , मात्र ते प्रधानमंत्री झाल्यावर अमेरिकेत गेले आणि त्यांनी तिथे सांगितलं की मै व्यापारी हु आणि व्यापारी कसा जनतेला लुटतो याचा प्रत्यय जनतेला येत आहे. डीझेल, पेट्रोलवर शेतकऱ्यांच्या नावाने कर घेतला जातो. वेगवेगळ्या मार्गाने खरबो रुपये जमा केले जातात. अठरा कोटीचा रस्ता अडीचशे कोटी मध्ये कसा केला जातो हे कॅगचा रिपोर्ट मधून समोर आलं ज्याचे अध्यक्ष प्रधानमंत्री आहे, त्यांचं सरकार आणि मंत्री कसे भ्रष्टाचारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे पटोले म्हणाले.

कृत्रिम महागाई वाढवली आहे, शेतकऱ्यांना फसवलं जात आहे या सगळ्या गोष्टीची पोलखोल करणार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात येड्याची सरकार आहे, त्याची पोल उघडकीस आणून भाजप विरोधात जो राग आहे. तो राग जनतेपर्यंत पोहोचून त्यांची सत्ता उलटवून लावणं हा पदयात्रेचा उद्देश असेल. आता त्यांच्याजवळ कुठली चेहरे बाकी राहिले नाही भाजप जवळचे सगळे चेहरे संपलेले आहे. भाजपचा खोटारडेपणाचा बुरखा फाटलेला आहे त्यामुळे मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी जे मुद्दे आणले त्यावर कोणीही विश्वास करायला तयार नाही असे टीकास्त्र भाजपवर पटोले ह्यांनी सोडले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »