महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी पर्यटन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त” २३ दिवसात पूर्ण केली ७ हजार किलोमीटरची बाईक राइड

नेशन न्युज मराठी टीम.

अलिबाग – भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. याच उत्सवाचा भाग म्हणून (INDUSEM) इंडिया यूएस इमर्जन्सी मेडिसिन कौन्सिल, जागतिक आरोग्य संघटना (WHO), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS, Delhi) यांच्यातर्फे ‘स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा’ आयोजित केली गेली. या माध्यमातून 12 राज्ये आणि तब्बल 7 हजार किलोमीटरच्या या मोटारसायकल परिक्रमेसाठी रायगड जिल्ह्यातील प्रसाद प्र. चौलकर (मुरुड जंजिरा) आणि अभिजित सिंग कोहली (पनवेल) या दोन अनुभवी बाईकर्सची विशेष निवड करण्यात आली होती. दि. 8 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल, रायगड येथून सुरू झालेली “स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा” महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडीसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात या 12 राज्यात प्रवास करून दि.30 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल येथे समाप्त झाली.

या परिक्रमेत ‘इजा प्रतिबंध’ (Injury Prevention) आणि ‘रस्ता सुरक्षा’ (Road Safety) हे महत्त्वाचे संदेश देण्यात आले तसेच “अतुल्य भारत”(Incredible India) चा प्रचार आणि प्रसार करत श्री.प्रसाद आणि अभिजित यांनी ही परिक्रमा 23 दिवसांत यशस्वीपणे पार पडली. या परिक्रमेदरम्यान नवीन भारतीय चलनी नोटांवर छापलेल्या ऐतिहासिक स्मारकांना भेट देऊन भारताच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली स्थळांच्या जतन आणि संवर्धनाबाबत जागरूकतेचा प्रयत्न केला गेला. इंडिया टुरिझम, पर्यटन मंत्रालय-भारत सरकार यांनी या परिक्रमेचे दिल्ली येथील प्रादेशिक कार्यालयात स्वागत केले. पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे म्हणत भारत पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या. इंडिया टुरिझम-जयपूर तसेच राजस्थान सरकार पर्यटन विभागाच्या राजस्थान येथील कार्यालयात प्रसाद आणि अभिजित यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यात आला. INDUSEM चे संस्थापक डॉ. सागर गालवणकर (अमेरिका) यांच्या विशेष सहकार्याने ही परिक्रमा पार पडली. दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी भारतातील सर्वात मोठी आरोग्य संस्था ‘एम्स’ दिल्ली येथे या दोन बाईकस्वारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी एम्स तसेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे उच्च पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच देश विदेशातील आरोग्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. यावेळी एम्स मध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांसोबत संवाद साधण्याची संधी श्री.प्रसाद आणि अभिजित यांना मिळाली. श्री.प्रसाद चौलकर हे आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू असून त्यांनी या आधी भारतातील 22 राज्ये आणि एकूण 3 देशात बाईक राइड केलेली आहे. भ्रमंती करताना आपली सामाजिक जबाबदारी म्हणून विविध सामाजिक संदेश देत रस्ता सुरक्षा संबधी जनजागृती करण्याचे बहुमोल कार्य ते करीत असतात. त्यांच्या कार्याबद्दल, प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक आयुक्त कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्थांद्वारे त्यांना सन्मानित केले गेले आहे.

त्याचप्रमाणे अभिजित सिंग कोहली हे एक अनुभवी बाईक रायडर असून कोविड-19 च्या संकटापासून मुक्त करण्यासाठी नांदेड, पाटणा, अमृतसर, आनंदपूर, भटिंडा (पंजाब) अशा 5 ठिकाणी तख्त यात्रेच्या माध्यमातून 5 हजार 436 कि.मी. अंतर बाईकवर पूर्ण केले. या बाईक राइडची दखल “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” द्वारे घेतली गेली. प्रसाद आणि अभिजित यांनी यापूर्वी गुजरात सरकारच्या गुजरात टुरिझमसाठी “रण ऑफ कच्छ’ बाईक राइड करून तेथील पर्यटनालाही चालना मिळण्यास आपले योगदान दिले आहे. येणाऱ्या काळात रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी येथील युवक-युवतींना एकत्र घेवून रायगड जिल्ह्यासाठी विशेष उपक्रम राबविणार असल्याचेही प्रसाद चौलकर व अभिजित सिंग कोहली यांनी सांगितले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »