महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी राजकीय

सरड्यापेक्षा लवकर रंग बदलतात,बच्चू कडूचे राणांवर टीकास्त्र

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

https://youtu.be/U2L1vupIwDM?si=YFsYCJkP3uLgyBuh

अमरावती/प्रतिनिधी – नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने अवैध ठरवले होते. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात आज (दि.4) राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. यात न्यायलयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नवनीत राणा रडलेल्या पाहायला मिळाल्या.
हायकोर्टाने नवीन राणांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. त्यावर आता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले “सध्या सर्वत्र तानाशाही सुरु आहे. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडला असता तर आम्हाला कीव आली असती, पण तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत आहात, हे दुर्दैवी गोष्ट आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या आधी त्यांचा निकाल येतो.एवढ्या वेळी कोर्ट कस काय चालते? त्यामुळे धर्म, जात सोडून ज्या लोकांना लोकशाही टिकावी असं वाटत असेल तर त्यांनी याचा विरोध केला पाहिजे”, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.

न्यायालयावरचा सर्वसामान्य माणसाचा विश्वास पायदळी तुडवला जात असेल, तर सगळं संपलं आहे.राणा हे हरलेल्या मानसिकेतून बोलत आहेत, त्यांची हार निश्चित आहे.राणा हे तिसऱ्या नंबर वरही राहणार नाही, नवनीत राणा ह्या 100% चौथा क्रमांक राहील” असे म्हणत बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला.
“हा निकाल दिल्यानंतर न्यायप्रिय लोक विचार करतील,108 पानाचा निर्णय हायकोर्टने दिल्यानंतर आता या कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यात आधीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागायच्या आधीच निकाल लागल्याचे सांगितलं.यावरून तानाशाही सुरू आहे हे समजतेय.काल मला चालता-चालता धमकीची चिट्ठी मिळाली,काही थोडे लोक राहणार आहेत विरोध करायला बाकी लोकच राहणार नाहीत विरोध करणारे.अतिशय वाईट अवस्था सुरू आहे देशाची” असे म्हणत बच्चू कडू यांनी आरोप केले.
एवढेच नाही तर बच्चू कडू यांनी रवी राणांवर देखील गंभीर आरोप केले. “आधी माफी पण मागितली नंतर भाऊ देखील म्हणाले,एवढे लाचार माणसं हिंदुस्थानात सापडणार नाही.त्यांनी तर दहा ठिकाणी सेटलमेंट केली आहे.रवी राणा यांनी आधी माफी मागितली होती, आम्हाला मोठा भाऊ म्हटल होतं, त्याच भावाला तुम्ही आता पैसे खाता अस म्हणता. सरडा तरी दोन दिवसांनी रंग बदलतो, त्यामुळे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की, राणा जर आमच्यासोबत असं असेल, तर सामान्य लोकांसोबत कसं वागत असेल?

Related Posts
Translate »