महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पाणीपुरवठा बंद असल्याने लोकसभा निवडणुकीवर नागरिकांनी टाकला बहिष्कार

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – महाराष्ट्राला निसर्गाची भरभरून साथ लाभलेली आहे. काळी सुपीक माती, पुरक हवामान असून सुद्धा आजही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांना पाणी टंचाईसारख्या भीषण समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच काही ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी असून देखील फक्त आणि फक्त त्याचे योग्य नियोजन नसल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथील नागरीक गेल्या 20 वर्षापासून पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देत आहे. लोकसभा निवडणुकांच्या या धुराळ्यात जनतेचे प्रश्न जाणून घेण्याइतपत वेळ देखील सरकारकडे नाही आहे. वारंवार तक्रार करूनही लासलगावातील पाण्याच्या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. म्हणून या विरोधात लासलगावातील नागरिकांकडून आज शहरात बंद पुकारण्यात आला. पाणी टंचाई समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी दिलेल्या लासलगाव बंदच्या हाकेला नागरीक आणि व्यापाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर देखील बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे लासलगाव येथील नागरिकांनी सांगितले आहे.

पाईपलाईन योजनेसाठी शासनाने 17 कोटी खर्च केले होते त्याचे काय झाले? असा सवाल माध्यमांशी बोलताना ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. शासनाने एवढे पैसे खर्च करून देखील 4 गावात सुद्धा योग्य पाणीपुरवठा होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विरोधकांवर टीका आणि आरोप करण्यात घालवला जाणारा वेळ गोरगरीब जनतेला दिला तर समाजातील अनेक मोठे प्रश्न सुटतील.

Related Posts
Translate »