महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

पंढरपुरातील चिंचणी गाव सव्वा वर्षांनंतरही कोरोनामुक्त,आजपर्यंत एकही रुग्ण गावात सापडला नाही

पंढरपूर/प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गावागावात, वाड्या-वस्त्यावर कोरोनाने थैमान घातले असताना पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावाने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आजपर्यंत कोरोनाला गावच्या वेशीवर रोखुन धरले आहे.गावकऱ्यांच्या एकीमुळे हे शक्य झाले असल्याचे गावातील नागरिक मोहन अनपट सांगत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार चिंचणी या गावात गेल्या सव्वा वर्षात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.नागरिकांनी कोरोनाच्या संदर्भात असलेले नियम पाळल्याने चिंचणी गाव कोरोना मुक्त राहिले आहे.गावात मास्क,सॅनिटाझर,आरोग्याची वेळेत तपासणी याची योग्य खबरदारी घेतली जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावची लोकसंख्या जेमतेम सुमारे एक हजाराच्या आसपास असून कोरोनापासून बचावासाठी गावात वावरत असताना लोक योग्य अंतर ठेवतात.गावाने गेल्या वीस वर्षांत सात हजाराच्या वरती झाडे लावली असून झाडांचे चांगल्या प्रकारे संगोपन केले आहे.त्यामुळे गावचा परिसर हिरवळीने नटलेला आहे.एकीकडे ऑक्सिजन अभावी अनेक कोरोना रुग्ण दगावत असताना गावातील झाडापासून मिळणाऱ्या मुबलक ऑक्सिजन मुळे कोरोना आमच्या गावात पोहचू शकला नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.
कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर चिंचणी गावातही दहशत पसरली होती.गावातील नागरिकांनी एकी दाखवत कोरोनाला गावापासून दूर ठेवण्यासाठी गावात होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमावर सुरुवातीपासून ते आजपर्यंत बंदी घातली आहे.किंबहुना लोक स्वतःहुन नियमांचे पालन करीत आहेत.गावात सर्दी खोकल्याची लक्षणे आढळणाऱ्या लोकांचे विलगिकरण करून उपचार केले जात आहेत.सुदैवाने आजपर्यंत या गावात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला नाही.गावात नागरिकांच्या आरोग्याची नित्य तपासणी सुरू असून गावातून दररोज बाहेर-जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची विशेष नोंद ठेवली जात आहे.सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन ची अमलबजावणी सुरू असताना या गावातील शेतीसह अनेक छोटे-मोठे उद्योग सुरळीत सुरू आहेत.लॉकडाऊन,टाळेबंदी केले असतानाही अनेक गाव-शहरात कोरोनाने शिरकाव करून हाहाकार माजवला असताना चिंचणीच्या नागरिकांनी कोरोनाला गावच्या वेशीबाहेर थोपवून ठेवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »