महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

डोंबिवली एमआडीसीत रस्त्यावर केमिकलचे निळे सांडपाणी, परिसरात मोठी दुर्गंधी

डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी प्रदूषणाच्या बाबतीत नेहमीच चर्चेत राहिली आहे. येथील अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणा मुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याच्यातच प्रदूषणाच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. केमिकलच्या पाण्यामुळे डोंबिवलीतील रस्ते गुलाबी होण्याची घटना काही महिन्यान आधी घडली होती. आता पुन्हा एकदा केमिकल मिश्रित निळे पाणी रस्त्यावर सोडल्याचे दिसून आले.त्यातून मोठ्याप्रमाणात परिसरात दुर्गंधी सुटली असल्याचे स्थानिक नागरीकांनी सांगितले.अधिकारीही या समस्येकडे लक्ष देत नसल्याने आता अधिकाऱ्यांना धुतल्यावरच हा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून डोंबिवलीतील प्रदूषणाकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचं लक्ष वेधलं आहे.

डोंबिवली एमआयडीसीत प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार नेहमी असते. काही महिन्यांपूर्वी केमिकलमुळे रस्ता गुलाबी झाल्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली होती. स्वतः पाहणी करून प्रशासनाला आणि कंपनी मालकांना ताकीद देऊन सूचना केल्या होत्या. मात्र अनलॉकमध्ये कंपन्या सुरू झाल्यानंतर परत केमिकल मिश्रित पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे,

एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने हा प्रकार घडत आहे. एमआयडीसी परिसरातील कल्याण-शीळ रोडला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर निळ्या रंगाचे पाणी पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या रसायन मिश्रित पाण्यातून चालताना त्वचेचे आजार होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. अस आजच्या घडणे वरून दिसून येत आहे.

Related Posts
Translate »