महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी महाराष्ट्र

चैतन्य तांड्यातून ”आपली पेंशन आपल्या दारी’ला योजनेला प्रारंभ

नेशन न्युज मराठी टीम.

चाळीसगाव/प्रतिनिधी– वयोवृद्ध, विधवा, दिव्यांगांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य सरकारने ”आपली पेंशन आपल्या दारी’ या मोहिमेला सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत घरपोच विशेष अर्थसहाय्याची वाटप करण्यात येणार असून याचा शुभारंभ आज तालुक्यातील चैतन्य तांडा येथून तहसीलदार अमोल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुंटुब अर्थसहाय्य या योजना राबविल्या जातात. दिव्यांग, वयोवृध्द, अनाथ बालके, आजारी व्यक्ती, एकल महिला इत्यादी हे या योजनांचे लाभार्थी आहेत. मात्र त्यांना दर महिन्याला पेंशन घेण्यासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागतात. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. हे लक्षात घेऊन राज्य सरकाने ”आपली पेंशन आपल्या दारी’ या योजनेला सुरुवात केली आहे.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि. १६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात १ जुलै, २०२२ पासून विशेष सहाय्य योजनेच्या शंभर टक्के लाथार्थ्यांना “आपली पेंशन आपल्या दारी” या योजने अंतर्गत अर्थसहाय्य घरपोच वाटप करण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार सदर अभियानाचा शुभारंभ तालुक्यातील चैतन्य तांडा व भोरस गावातून तहसीलदार अमोल मोरे यांच्या हस्ते बुधवार रोजीपासून करण्यात आले आहे. सदर योजना यशस्वी राबविण्यासाठी तलाठी व इंडिया पोस्ट बॅकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या आहे.

याप्रसंगी नायब तहसीलदार धनंजय देशपांडे, कारकून संजय पाटील, पोस्टमन पंकज पाटील, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंद राठोड, सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड, तलाठी मोहीम, सदस्य राजेंद्र चव्हाण, भाऊलाल चव्हाण, उदल पवार, ग्रामस्थ कोंडू राठोड, भावलाल राठोड, रघुनाथ राठोड, जालम पितांबर, जालम राठोड यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »