महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image लोकल बातम्या

कल्याण पूर्वेत महापरीवाराच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – सम्राट अशोका विजया दशमीच्या ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कल्याण पूर्वेत महापरिवाराच्या साजरा करण्यात आला. तथागत भगवान गौतम बुद्धांनी इ.स. पूर्व ५२८ च्या आषाढ पौर्णिमेला सारनाथ येथे केले. त्यांनी कौंडिण्य, वप्प, भद्दीय, अश्वजित आणि महानाम या पाच परिव्रजकांना धम्माचे सार म्हणजे विशुद्धीमार्ग सांगून पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले.

आपल्या राज्याभिषेकाच्या ८ व्या वर्षी इ.स. पूर्व २६१ मध्ये सम्राट अशोकाने कलिंग देशावर आक्रमण केले. तेराव्या शिलालेखानुसार कलिंग युद्धात १ लाख ५० हजार लोकांना बंदी करुन निर्वासित केले गेले. जवळपास १ लाख लोकांची हत्या झाली. यानंतर कलिंग देशावरील विजयाच्या १० व्या दिवशी अशोकाने धम्म दीक्षा घेतली. त्या दिवसाला जगाच्या इतिहासामध्ये “अशोका विजया दशमी” म्हटले जाते. सम्राट अशोका सोबत जवळपास ८० हजार लोक होते. त्यानंतर जवळपास २२१६/१७ वर्षांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागभूमित, नाग नदीच्या काठी, नागपूर येथे अशोका विजयादशमी दिनी म्हणजे १४ ऑक्टोबर,१९५६ रोजी आपल्या ५ लाख अनुयायासह मोठी धम्मक्रांती केली.

या  ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात जेष्ठ बोद्धाचार्य नामदेव जाधव यांनी उपस्थितांना त्रीसरण पंचशील ग्रहण करून महापुरुषांच्या जीवनाची माहिती दिली. यावेळी महापरीवाराचे संस्थापक अध्यक्ष रंजन पवार, खजिनदार अविनाश गायकवाड, कार्याध्यक्ष प्रभाकर जाधव, संजय धनगर, सदस्य प्रकाश जाधव, नितीन जाधव, शशिकांत मुंढेकर, हरी भालेराव, अन्वर शेख, धर्मा वक्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार अशोक कांबळे यांनी केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »