जी २० परिषदेच्या निमित्ताने आयोजित सायकल रॅलीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – पुण्यात होणाऱ्या जी20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सायकल क्लब तर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात.
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – पुण्यात होणाऱ्या जी20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सायकल क्लब तर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – लष्करी अभियांत्रिकी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय हरित हायड्रोजन.
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – कोल्हापूरची ऑलिम्पियन तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले यांनी बालेवाडभ स्टेडियमवर अनुक्रमे ५० मीटर.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – कोलकाता येथील एचसीएल कॉर्पोरेट कार्यालयात हिंदुस्तान कॉपर लिमिटेड आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (इंडियन.
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी – भारतीय विज्ञान काँग्रेसच्या आयोजनानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील प्राचिन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग, केंद्र.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वेमंडळाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणून पदभार स्वीकारला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अनिल कुमार लाहोटी यांची रेल्वेमंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. या आधी अनिलकुमार लाहोटी यांनी रेल्वेमंडळाचे सदस्य (पायाभूत सुविधा) म्हणून काम केले आहे. लाहोटी हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्सच्या 1984 सालच्या तुकडीतून उत्तीर्ण झाले आहेत तसेच ते भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेच्या लेव्हल-17च्या पहिल्या पॅनेलमध्ये समाविष्ट होते. त्यांनी माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, ग्वाल्हेर येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे आणि रुरकी विद्यापीठातून (IIT, रुरकी) अभियांत्रिकी (स्ट्रक्चर्स) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. रेल्वेमधील त्यांच्या 36 वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या कारकिर्दीत त्यांनी मध्य, उत्तर, उत्तर मध्य, पश्चिम आणि पश्चिम मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डात विविध पदांवर काम केले आहे. लाहोटी यांनी यापूर्वी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून काम केले आहे तसेच त्यांनी अनेक महिने पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले आहे.महाव्यवस्थापकीय पदावरील त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक मालवाहतूक आणि सर्वाधिक संख्येने किसान रेल्वे चालवण्यासह सर्वाधिक संख्येने पार्सल वाहतूक टनेज वाहून नेण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते, ज्यातून रेल्वेला अधिक लाभदायी महसूल प्राप्त झाला. भाडे न देता, भंगार विक्री आणि व्यापक तिकीट तपासणी या मोहिमांद्वारे त्यांनी महसुलात विक्रमी सुधारणा घडवून आणली.मुंबईतील वातानुकूलित उपनगरी सेवांच्या विस्ताराचा प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळला आणि सोडवला. त्यांच्या कार्यकाळात,मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणी करून त्या आणि कार्यान्वित करण्यात मोठी झेप घेतली तसेच मध्य रेल्वेचा ठाणे उपनगरीय मुंबईतील दिवा आणि ठाणे दरम्यानचा बहुप्रतिक्षित पाचवा आणि सहावा मार्ग सुरू केला. गजबजलेल्या गाझियाबाद-प्रयागराज-DDU मार्गाला पर्याय म्हणून लखनौ-वाराणसी-DDU मार्गावरील मालवाहतूक सुधारण्यासाठी त्यांनी लखनौ, उत्तर रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम पहात असताना पुढाकार घेऊन अनेक कामे केली. त्यांच्या कार्यकाळात लखनौ विभागातील स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधा आणि स्वच्छतेच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. उत्तर रेल्वेवर मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) आणि मुख्य अभियंता (बांधकाम) या नात्याने त्यांनी नवीन रेल्वेमार्ग, ट्रॅकचे दुहेरीकरण आणि मल्टी-ट्रॅकिंग, यार्डांची पुनर्रचना, महत्त्वाचे पूल, स्टेशन बांधणी इत्यादी पायाभूत सुविधा प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली. आनंद दिल्लीतील विहार टर्मिनल आणि नवी दिल्ली स्थानकाच्या अजमेरी गेट बाजूच्या स्थानकाच्या इमारतीची बांधकाम योजना त्यांनी तयार केली होती. नवी दिल्ली स्थानकाचा जागतिक दर्जाचे स्थानक म्हणून पुनर्विकास करण्याच्या नियोजनाशीही त्यांचा जवळचा संबंध होता, ज्यात जमीन आणि हवाई जागेच्या व्यावसायिक विकासाचा समावेश होता. लाहोटी यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठ, पिट्सबर्ग, यूएसए येथे धोरणात्मक व्यवस्थापन आणि नेतृत्व कार्यक्रमांचे; तसेच बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, मिलान, इटली;आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद, अशा नामवंत संस्थांतून प्रशिक्षण घेतले आहे.त्यांनी हाँगकाँग, जपान, यूके, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमधील स्थानकांच्या विकासासह रेल्वेच्या जमिनीवरील व्यावसायिक विकासाचा अभ्यास केला आहे.रेल्वेमार्ग तंत्रज्ञान आणि (ट्रॅक टेक्नॉलॉजी) आणि रेल्वेमार्ग परिरक्षण यंत्रांच्या (ट्रॅक मेंटेनन्स मशीन) विकासासंदर्भात त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. Related Posts एक सही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी’: हर्ष.
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोळसा मंत्रालय कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि एससीसीएल साठी 330 दशलक्ष टन (एमटी) क्षमतेचे अतिरिक्त 19 फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी (एफएमसी) प्रकल्प हाती घेणार आहे आणि हे प्रकल्प आर्थिक वर्ष 26-27 पर्यंत कार्यान्वित होतील. मंत्रालयाने यापूर्वीच 18000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्रतिवर्ष 526 दशलक्ष टन क्षमतेचे 55 एफएमसी प्रकल्प (44 – सीआयएल, 5- एससीसीएल आणि 3 – एनएलसीआयएल) हाती घेतले आहेत. त्यापैकी प्रतिवर्ष 95.5 दशलक्ष टन क्षमतेचे आठ प्रकल्प (6-सीआयएल आणि 2एससीसीएल) कार्यान्वित झाले आहेत आणि उर्वरित आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कार्यान्वित होतील. भविष्यात कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही कोळसा उत्खनन सुनिश्चित करण्यासाठी, मंत्रालय राष्ट्रीय कोळसा लॉजिस्टिक योजनेच्या विकासावर काम करत आहे ज्यात कोळसा खाणींजवळील रेल्वे मार्गांद्वारे फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि कोळसा क्षेत्रांमध्ये रेल्वे नेटवर्क मजबूत करणे समाविष्ट आहे. कोळसा मंत्रालयाने आर्थिक वर्ष 25 पर्यंत 1.31 अब्ज टन कोळसा आणि आर्थिक वर्ष 30 मध्ये 1.5 अब्ज टन उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या संदर्भात, किफायतशीर, जलद आणि पर्यावरणस्नेही कोळसा वाहतुकीचा विकास महत्त्वाचा आहे. खाणींमधील कोळशाची रस्ते वाहतूक टाळण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्याकरिता मंत्रालयाने धोरण तयार केले आहे आणि एफएमसी प्रकल्पांतर्गत यांत्रिक कोळसा वाहतूक आणि लोडिंग सिस्टम अद्ययावत करण्यासाठी पावले उचलली आहेत. जलद माल भरण्याची व्यवस्था असलेल्या कोळसा व्यवस्थापन सयंत्र (CHPs) आणि एसआयएलओ सह कोळशाचे तुकडे करणे, त्यांना निर्धारित आकार देणे आणि संगणकाच्या मदतीने कोळसा भरणे हे फायदे असतील. वर्ष 202021 मध्ये नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्थेमार्फत (NEERI), अभ्यास करण्यात आला.NEERI अहवालाने वार्षिक कार्बन उत्सर्जन बचत, ट्रकच्या फेऱ्यांची घनता कमी करणे आणि प्रति वर्ष 2100 कोटी रुपयांची डिझेल बचत दर्शवली आहे. Related Posts एक सही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी’: हर्ष फाउंडेशनच्या स्वाक्षरी अभियानाला.
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – रस्त्यावरील मुलांना काळजी व संरक्षणाची गरज असून त्यांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी.
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आपदा मित्रांच्या पहिल्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींना आज पूरपरिस्थितीतील बचाव.