महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image आरोग्य चर्चेची बातमी

ठाणे महानगरपालिका परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसविले जमिनीवर

नेशन न्यूज मराठी टिम.

ठाणे/प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात  महानगरपालिका भवनात परिचारिका भरती साठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यात काही अपवाद वगळता सर्वच उमेदवार या महिलाच होत्या.ठाणे महापालिके तर्फे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात परिचारिका पदासाठी 72 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या. या 72 पदांसाठी राज्यभरातून जवळपास 450 हुन जास्त उमेदवार आल्याने त्यांची व्यवस्था करायची कुठे असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला.त्यामुळे त्यातील काही उमेदवारांना चक्क पहिल्या माळ्यावर असणाऱ्या लॉन च्या आणि महापौर कार्यालयाच्या लॉबीतच त्यांना जमिनीवरच बसवण्यात आले.

मुलाखतीचा नंबर आल्यावर तिसऱ्या मजल्यावर त्यांना पाठवण्यात येत असे.सदरचा प्रकार लक्षात आल्यावर तसेच पत्रकरांनीही याबाबत प्रशासनाला विचारणा केल्यावर तात्काळ या सर्व उमेदवारांना पालिकेच्या सभागृहात बसवण्यात आलं.याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत पालिकेच्या उपायुक्त कार्यालयात धडक देत पालिकेला यबाबत जाब विचारला.एवढी गर्दी येणार याची माहिती असूनही पालिकेने नीट व्यवस्था केली नाही जर गडकरी अथवा घाणेकर नाट्यगृहात मुलाखती घेतल्या असत्या तर हे टाळता आले असते असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसन म्हंटले.

तर आम्ही आलेल्या सर्व उमेदवारांची योग्य ती काळजी घेतली असून त्यांना सकाळी सभागृहातच बसवण्यात आल होतं मात्र गणपती उत्सवा संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याने  फक्त काही काळासाठी त्यांना बाहेर बसवण्यात आल होत त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय झाली नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी आलेल्या गरजूनच असा अनादर करणे कितपत योग्य आहे असा प्रश्र्न सामान्य नागरिकांच्या मनात आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »