Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image राजकीय

पाणी देण्याचा आदेश रद्द करण्यात यावा यासाठी पालकमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मोहोळ येथे दहन

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचे ५ टिएमसी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यासाठी नेहण्याच्या घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा.यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनासह राजकीय पक्ष आक्रमक झाले असून जिल्ह्यात ठीक ठिकाणी पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत.उजनीतील पाणी पळवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मोहोळ येथे शिवसैनिकांनी दहन केले.यावेळी जलसंपदा विभागाने पाणी देण्याचा घेतलेला आदेश त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.
उजनी धरणाची निर्मितीच सोलापूर जिल्ह्यासाठी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रगतशिल व्हावा यासाठी हे धरण बांधण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याला अद्यापही उजणी धरणातून व्यवस्थीत पाणी मिळत नाही. आणखी बराच भाग कोरडा असताना ५ टीएमसी पाणी पळवण्याचा प्रयत्न होत आहे. तो आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार यांनी दिला आहे.
यावेळी शिवसैनिकांनी पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच अशी घोषणाबाजी करत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दादासाहेब पवार, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष कयूम शेख ,भागवत मुळे, बाळासाहेब वाघमोडे , प्रमोद लांडे , दयानंद व्यवहारेआदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X