महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

उल्हासनगरमध्ये इमारत दुर्घटनेचे सत्र सुरूच, ५ मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू

उल्हासनगर/प्रतिनिधी – उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा भीषण इमारत दुर्घटना झाली आहे. एका 5 मजली इमारतीचे स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शुक्रवारी रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. उल्हासनगरच्या 2 नंबरमधील नेहरू चौकात बँक ऑफ बडोदासमोर ही साई सिद्धी नावाची इमारत आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देत बचाव आणि मदतकार्याची पाहणी केली.

या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ठाणे महापालिकेची डिझास्टर रेस्क्यू फोर्सची टीमही घटनास्थळी दाखल झाली. या ठिकाणी शोधकार्य सुरू असून आत्तापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे

दरम्यान १५ मे रोजीही उल्हासनगरमध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. उल्हासनगर शहरातील कॅम्प एक भागात असलेल्या मोहिनी पॅलेस या 4 मजली इमारतीच्या टेरेसचा स्लॅब कोसळून 5 जणांना जीव गमवावा लागला होता. त्याला अवघे काही दिवसही उलटत नाहीत तोच काल आणखी एक दुर्घटना घडल्याने इथल्या इमारतींच्या सुरक्षेचा आणि नागिरकांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »