महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण-डोंबिवली शहराच्या वाटोळ्याला भाजपाही जबाबदार-मनसे आ. राजू पाटील

प्रतिनिधी.

कल्याण – डोंबिवली एमआयडीसी व लगतच्या ९ गावांमध्ये सुधारित मालमत्ता कर आकारण्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली. 

केडीएमसीत भाजपच्या कालच्या ठिय्या आंदोलनावर मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. शिवसेना-भाजपमध्ये सहा महिन्यांपूर्वी राजकीय घटस्फोट झाला आहे. भाजप दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. 25 वर्षांपासून भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होती. त्यामुळे दोन्ही शहरांचे वाटोळे लावण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.तर कल्याण डोंबिवलीतील रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात बोलताना “पत्री पुलाचे ज्या प्रकारे काम सुरु आहे, तो जगातील आठवा अजूबा होणार असे वाटतंय”, अशी टीका त्यांनी केली. कारण, या पुलावर आज त्यांना महापालिकेत येताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नागरीकांना किती त्रास सहन करावा लागतो. याकडेही आमदारांनी लक्ष वेधले.दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी 27 गावातील मालमताना चुकीच्या दराने केलेल्या कर आकारणीकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले. पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावपैकी 18 गावे वगळली गेली असली तरी आद्यपी पालिकेत असलेल्या 9 गावांना महापालिका प्रशासनाने योग्य दरानुसार कर आकारणी करण्याऐवजी 2015 च्या बाजार भावानुसार कर आकारणी केली आहे. यामुळे नागरिकांना 3 पट, 5 पट आणि काही जणांना 8 पट कर वाढ लादली गेली असून ही आकारणी चुकीची असल्याचे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आमदार पाटील यांनी आणून दिले.तसेच हा प्रश्न सोडविल्यास पालिकेचा रखडलेला मालमत्ता कर वसूल होऊ शकेलं असे ते म्हणाले.तसेच आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांना पत्र सुद्धा दिले आहे.गेल्या तीन वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित असल्याने हा मालमत्ता कर प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी आयुक्तांनी सांगितले.

Related Posts
Translate »