महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी देश

भारतीय रसायने परिषदेचा पुरस्कार सोहळा संपन्न

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनिधी – मुंबईत भारतीय रसायने परिषदेच्या (आयसीसी) पुरस्कार समारंभ आयोजित केला गेला होता. केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी ते सांगत होते कि, भारतीय अर्थव्यवस्थेत रसायने आणि पेट्रोकेमिकल उद्योगाची भूमिका महत्वाची असून, त्याने इतर अनेक क्षेत्रांना देखील विकसित केले आहे. रसायन उद्योगात 80,000 पेक्षा जास्त रासायनिक उत्पादनांचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने अधिक चांगल्या पायाभूत सुविधांची निर्मिती, व्यवसाय सुलभता आणि रसायने क्षेत्रासाठी पीआयएल यासारखे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. देशांतर्गत उत्पादन जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी, रासायनिक उत्पादनात जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे उत्पादक घडवण्यासाठी, निर्यातीला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ते पुढे म्हणाले की भारताने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात थेट परदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) 91% वाढ नोंदवली आहे. यावरून, या क्षेत्राची गुंतवणूक, विकास आणि रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता दिसून येते. रसायन उद्योग सध्या 210 दशलक्ष/अब्ज यूएस डॉलर्सचा आहे आणि 2025 पर्यंत तो 300 चा टप्पा गाठण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय रसायने परिषदेचे अध्यक्ष बिमल गोकुळदास यांनीही पुरस्कार सोहळ्यात आपले विचार मांडले आणि रसायन उद्योगाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, रसायन उद्योगांविषयीची धारणा बदलण्याची गरज आहे, आणि या उद्योगाच्या महत्वाबाबत लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे, हे वास्तव रसायन उद्योगाशी संबंधितांनी लक्षात घ्यायला हवे. या उद्योगाशिवाय माणसाची एकही गरज पूर्ण झाली नसती आणि इतर उद्योग विकसित झाले नसते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उद्योगातील पद्धती अद्ययावत करण्यासाठी, आयसीसी सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणासह अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असल्याची माहिती त्यांनी दिली, आणि या प्रयत्नांचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे नमूद केले.

भारत सरकारच्या रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे सहसचिव (रसायने) एस. के. पुरोहित, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारतीय रसायने परिषद आयसीसी पुरस्कार कंपन्यांना प्रदान करण्यात आले, आणि रसायने उद्योगाच्या विविध क्षेत्रांमध्ये अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »