महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी बिझनेस

एन आर सी कामगारांचे थकीत देणी मिळण्यासाठी राज्य सरकारला साकडे

    प्रतिनिधी.

    कल्याण – कल्याणजवळील आंबिवली येथील एनआरसी कंपनीतील कामगार कंपनीत टाळेबंदी झाल्यानंतर मागील ११  वर्षे आपल्या हक्काच्या पैशासाठी लढा देत आहेत. मात्र अद्याप कामगारांना थकीत देणी मिळालेली नाहीत याबाबत शनिवारी ऑल इंडिया इंडस्ट्रीयल अँड  जनरल वर्कर्स युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव उदय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली .यावेळी चौधरी यांनी २००९ साली टाळेबंदी होताना कंपनीत काम करत असलेल्या सुमारे ४००० कामगारांनी  १३००कोटी रुपयाचा क्लेम केला आहे. मात्र अदानी समुदायाकडून कामगाराची १०० कोटीवर बोळवण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे कामगारांनी रणशिंग फुकले आहे. यामुळेच कामगारांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचा दरवाजा खटखटावला आहे. मात्र विकासक आणि कंपनी प्रशासनाकडून कामगाराची फसवणूक करण्याचा डाव सुरु असल्याचा आरोप केला. एनआरसीची सुमारे ४४३  एकर जमीन असून यातील काही भूखंड हा सरकारी मालकीचा असतानाही कंपनीकडून सरकारची फसवणूक करत हा भूखंड लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करू शकते मात्र राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप ऑल इंडिया इंडस्ट्रीयल अंड जनरल वर्कर्स युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव उदय चौधरी यांनी केला तसेच राज्य सरकारने हस्तक्षेप करत कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कामगाराच्या वतीने चौधरी यांनी केली आहे. दरम्यान जोपर्यत कामगारांना त्यांच्या हक्काची देणी मिळत नाहीत तोपर्यत लढा सुरु राहणार असून लवकरच कामगाराच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली जाणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. 
    दरम्यान  ऑल इंडिया इंडस्ट्रीयल अँड जनरल वर्कर्स युनियन महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी  उदय चौधरी  यांनी कामगारांची देणी समाधानकारक मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा आणि संघर्ष सुरूच राहील  नुसते जमिनीच्या भाव ६ हजार कोटी आहे त्यामुळे  कामगारांवर अन्याय का करता याकडे राज्य सरकारने  लक्ष घालावे अशी  विनंती वजा मागणी ही केली .

    Related Posts
      Translate »