महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर महत्वाच्या बातम्या

शहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

धुळे/प्रतिनिधी – राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्यासाठी सुद्धा पुरेसे पाणी उपलब्ध नाही आहे. ऐन उन्हाळ्यात आपली तहान भागवण्यासाठी प्रत्येक जिवाची धडपड सुरू आहे. धुळे शहरातही गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे पाणीपुरवठा होत नसल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धुळे शहराच्या विविध भागात आठ ते नऊ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, दरम्यान सध्याच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच दुसरीकडे आठ ते नऊ दिवसात होणारा पाणीपुरवठा देखील शुद्ध होत नसून, गढूळ पाणी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे.

या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा तसेच शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. धुळे मनपा उपायुक्त संगीता डहाळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts
Translate »