महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसलेले असून ते कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरचे सरकार – आदित्य ठाकरे

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/gQWpfY5S3sM?si=OGUR13Sc_SozUBmX

संभाजीनगर / प्रतिनिधी – सध्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.मराठवाड्यातील त्यांचा दौरा फक्त शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रश्न समजून घेण्यासाठी आहे असे ते म्हणाले. माध्यमाशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विद्यमान सरकारचा चांगलाच समाचार घेतला. त्यावेळी आदित्य म्हणाले. कोट्यवधींचा खर्च होऊन त्यातून जर का मराठवाड्याला काही मिळत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. मात्र असाच खर्च गोवाहाटी या ठिकाणी केला आहे हा खर्च कुठून आला हा प्रश्न अजूनही आहे.

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घोषणा झाल्या तर त्याची अंमलबजावणी होणार आहे का ? काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती पिकांचे नुकसान झाले होते मात्र अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही त्यामुळे अजून किती खोटी आश्वासन हे खोके सरकार देणार आहे. उद्या मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक आहे, या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठवाड्याला काय मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. असेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसलेले आहे आणि यामुळे आपल्याकडे जागतिक लोकशाही दिवस साजरा करायचा की नाही हा प्रश्न पडतो. जी आश्वासन दिले आहे तेच अद्यापही पूर्ण झाले नाहीत यापूर्वी आमच्या आमदारांनी असे प्रश्न केले होते तेव्हा सरकार अडचणीत आले होते मात्र सरकार तोडाफोडीत मध्ये व्यस्त आहे. हे सरकार कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरचे आहे जनतेचे राहिलेले नाही. तीन जवान शहीद झाले त्यावेळेला आम्हाला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षामध्ये कसले सेलिब्रेशन सुरू होते आणि याचे उत्तर भाजपाने द्यायला हवे.असा सवालही यावेळी आदित्य टाकरे यांनी सरकारला केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »