नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – ‘दिव्यांग’ असणे म्हणजे खरे तर अपंगच, याच दिव्यांगत्वा सोबत जगणे आणि आयुष्यातील सर्व अडचणींना तोंड देणे ही प्रत्येकासाठी सोपी बाब नसते. मात्र, हेच दिव्यांगत्व आपल्या स्वप्नाच्या आड येऊ शकतं नाही. याचे उदाहरण नागपुरातील एक दिव्यांग खेळाडूंन दिले आहे. तो खेळाडू म्हणजे तब्बल 4 वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर धनुर्विद्येत भारताचे प्रतिनिधित्व करणारा संदीप गवई हा होय.
नियतीने जरी आपल्याशी खेळ खेळला असला तरी स्वतःच्या अंगी असलेल्या आत्मविश्वासाच्या ताकदीवर स्वत:ला सिद्ध करत संदीपने आजवर अनेकदा यश संपादन केले आहे आहे. मात्र, शासनाच्या खेळाडूंप्रती असलेल्या उदासीन वृत्तीमुळे आज देशासाठी जागतिक स्तरावर पदके मिळवून देणाऱ्या खेळाडूवर चहा पोहे विकून आपला उदरनिर्वाह चालवण्याची दुर्देवी वेळ आली आहे. शासन दरबारी अनेकदा शासकीय नौकरीचे आश्वासन देण्यात आले, त्यासाठी अनेकदा पाठपुरावा देखील करण्यात आला. मात्र, शासन केवळ कागदी घोडे नाचविण्यात व्यस्थ असल्याने, आज या खेळाडूंला आखेर परिस्थिती पुढे हतबल होत हा व्यवसाय थाटून पोट भरण्याची वेळ आली आहे.
संदीप गवई हा पॅरा आर्चरी या क्रीडा प्रकारात खेळ असून गेल्या 14-15 वर्षापासून त्यांने देशासाठी आजवर अनेक स्पर्धा खेळून भारतचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये चार आंतरराष्ट्रीय स्पर्धासह राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर स्पर्धामध्ये एकूण 18 हून अधिक मेडल पटकावले आहेत. तसेच शासनाच्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार याचा देखील समावेश आहे. संदीप एका पायाने दिव्यांग असून त्याला पोलिओ झाला होता. त्यात तो 42% दिव्यांग आहे. 2018 साली शासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या सामान्य व दिव्यांग खेळाडूंना नोकरी संदर्भात एक आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी अनेक खेळाडूंची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. यासह कागदा पत्रांची पडताळणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती. मात्र 2018 ते 2023 या पाच वर्षाच्या कालावधीत यात कुठलीही कारवाई झाली नाही. आम्ही वेळोवेळी शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केला. मात्र, अद्याप त्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. शासनाने आमच्यासारख्या दिव्यांग खेळाडूला प्रोत्साहन दिले तर देशासाठी काही तरी करून दाखवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी मदत आम्हा खेळाडूंना होऊ शकेल म्हणून संबंधित मंत्रींनी यात लक्ष घालावे असे मत संदीपने बोलतांना व्यक्त केले.
माझ्या घरातील परिस्थिती नाजूक आहे. घरी माझी पत्नी दोन मुलं वयोवृद्ध वडील असा प्रपंच आहे. माझ्या खेळासाठी समाजातील अनेक संस्था व मान्यवरांनी मला सढळ हाताने मदत केली. आर्चरी हा क्रीडा प्रकार अतिशय महागडा असला तरी समाजातील लोकांच्या सहकार्यामुळे आणि माझ्यातील आत्मविश्वासामुळे मी या खेळात आपल्या देशासाठी काहीतरी करू शकलो याचा अतिशय आनंद आहे. मात्र घरची परिस्थिती आणि खेळ यातील दोलारा सांभाळणे हे माझ्या आवाक्या बाहेर असल्याने आणि शासन दरबारी कायम उपेक्षा मिळाल्याने अखेर परिस्थिती पुढे हतबल होत मी चहा पोह्यांचा गाडा माझ्या दारात लावून माझा उदरनिर्वाह भागवत आहे. अशी माहिती संदीप यांनी दिली. माझी वेळोवेळी अनेकांशी या बाबत चर्चा त्यांच्यापर्यंत माझी कैफियत मी मांडली. मात्र मला अद्याप आश्वासन शिवाय दुसरे काही हाती लागले नाही. एकवेळ शासन माझ्या बाबतीत उदासीन असेलही मात्र, त्याहून कैकपट दुःख मला त्या गोष्टीचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना मी प्रशिक्षण देतो, त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांच्या मनात माझी अवस्था पाहून अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित करणारी माझी व्यथा आहे. ते पुढे हे क्रीडा क्षेत्र निवडताना विचार करतील. जर माझ्या सारख्या खेळाडूची ही अवस्था आहे तर इतरांच्या मनात एक नकारात्मक विचार पेरला जाईल. जो की माझ्या लेखी दुर्देवी आहे. असे मत संदीप याने बोलतांना व्यक्त केले.