महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी महाराष्ट्र

पाणी न आल्यास मनपा कार्यालयाला कुलूप लावण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

चंद्रपूर/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील अनेक गावे ,मानवी वस्त्या अशा आहेत जिथे आजही पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी नाही. घोटभर पाण्यासाठी काही लोक भर उन्हात पाई चालत अनेक मैल प्रवास करताना दिसतात. कारण प्रशासन आणि शासन यांना त्यांच्या हक्काचे पाणी देण्यास अपयशी ठरत आहे. लोकांचे जीवन सुलभ आणि चांगले बनविण्यासाठी पाणी योजणा राबवल्या जातात. मात्र अनेक वर्षे उलटून गेली तरीही या योजणांपासून सर्वसामाण्य नागरिक वंचित आहे. असाच प्रकार चंद्रपूरमध्ये झाला असून नागरिक रस्त्यावर उतरले.

5 वर्षांपूर्वी मनपाने अमृत योजनेच्या कामाला प्रारंभ केला, त्यानंतर 3 मे 2021 मध्ये तुकूम प्रभागातील सुमित्रा नगर भागात अमृत पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र 3 वर्षाच्या कालावधीत सुमित्रा नगर येथील अमृतच्या पाईपलाईन मध्ये पाण्याचा थेंब आला नाही. ज्या भागात पाईपलाईन गेली त्या भागात पाणी पोहचले नाही. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी याबाबत माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्याकडे तक्रारी केल्या. याबाबत त्यांनी मनपाला वेळोवेळी निवेदने दिली. मात्र निवेदनावर काही कारवाई होत नसल्याने आज 15 मे रोजी सुमित्रा नगर भागातील नागरिकांना सोबत घेत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी मनपाचे अधिकारी आंदोलनात पोहचले त्यांनी आंदोलन कर्त्यांना येत्या 10 दिवसात आपल्या भागात नियमित पाण्याचा पुरवठा सुरू होणार असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की “10 दिवसात या भागात जर पाणी आले नाही, तर आम्ही सर्व नागरिक मनपा कार्यालयात पोहचत मनपाला कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही.” आंदोलनानंतर सुमित्रा नगर भागातील आंदोलनकर्ते नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली, आंदोलनादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »