महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

ड्रेझर’ विरोधात भूमिपुत्र आणि आदिवासी मजूरांचे खाडीपात्रात आंदोलन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

ठाणे/प्रतिनिधी –  ड्रेझर’ विरोधात डुबी पद्धतीने रेती काढणाऱ्या  हजारो भूमिपुत्र आणि आदिवासी मजूरांनी 150 बोटींसह आज खाडीपात्रात उतरुन आंदोलन केले. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीच्या खाडीकिनारी दोन्ही बाजूला कशेळी ते गायमुखपर्यंत ३० ते ३५ गावे वसलेली आहेत. १९६० पासून येथील स्थानिक भूमिपुत्र शेतीला जोडधंदा म्हणून पारंपारिक डुबी पद्धतीने रेती काढण्याचा व्यवसाय करत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांनी हा भाग स्थानिकांसाठी राखीव ठेवला आहे. या व्यवसायावर या भागातील भूमिपुत्र आणि आदिवासी मजूर अशा २० ते २५ हजार जणांची उपजीविका चालते. जव्हार, वाडा, मोखाडा, पालघर या भागातील बेरोजगार, आदिवासी बांधवांची या व्यवसायावर उपजीविका आहे.

मात्र आता ड्रेझर्सला (यांत्रिकी पद्धतीने) रेती काढायला परवानगी देण्यात आली आहे. या शासन निर्णयामुळे स्थानिकांमध्ये मोठा असंतोष आहे. या पट्ट्यामध्ये विकासाच्या नावाखाली आता जल वाहतूक करण्यासाठी ड्रेझर्सने उत्खनन केले जात आहे. यामुळे या भागातील  २० ते २५ हजार भूमिपुत्र व  कुपोषित भागातील हजारो आदिवासी बांधव  बेरोजगार होणार आहेत.या पट्ट्यात शेकडो वर्षांपासून डुबी मारून साधारण ५० पेक्षा अधिक फूट खोल खाडी पात्र झालेले आहे. तसेच याच भागातून २०० ते २५० टनाच्या बार्जेस जात असताना निमित्त साधून खोली करण्याच्या नावाखाली `ड्रेझर’ परवानगी देऊन श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भूमिपुत्रांनी केला आहे. `ड्रेझर’ ने उत्खनन करून काढलेली रेती ड्रेझर्स वाल्यांकडून २४०० रूपये ब्रासने महसूल खाते खरेदी करून ६६० रूपये ब्रास भावाने बाजारात विकणार आहे. तरी एका ब्रास साठी १७४० रूपये तोटा सरकार सहन करणार आहे. हे कोणासाठी तर श्रीमंतांसाठी सरकार एवढा करोडो रुपयांचा तोटा सहन करणार आहे. यामध्ये मासिक कोट्यवधी रुपये तोटा होणार आहे. तो कोणासाठी ? असा सवाल करण्यात येत आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज कशेळी ते गायमुख खाडीच्या मधोमध जिथे ड्रेझर उभी आहे. त्या ठिकाणी (नागला बंदर खाडी पात्र) घेराव घालून काळे झेंडे दाखविण्यात आले.  

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »