महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, महाविकास आघाडीची मागणी

नेशन न्यूज मराठी टीम.

जालना / प्रतिनिधी – जालना जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे खरिप पिके होत्याची नव्हती झाली आहेत. याचसंदर्भात आज जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.

त्यात मागणी केली आहे की लवकरात लवकर जालन्यात जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर कराव्यात. तसेच अद्याप जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही त्यात शेतकऱ्यांना ई केवायसी मुळे लाभ मिळाला नाही ते पूर्ण करून लवकरात लवकर पूर्ण शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना विमा मिळणेबाबत संबंधित विमा कंपनीच्या अधिकारी यांना शासनाने सांगितल्यानुसार पत्रव्यवहार झाला परंतु त्यांना अद्याप पिकविमा मिळालेला नाही.

जालना जिल्हयामधील सर्व मंडळामध्ये यावर्षी ४० दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला असून शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पिकविमा भरलेला आहे. पिक विमा कधी मिळणार, अशी शेतकरी वारंवार विचारणा करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांना अग्रीम पिकविमा मंजुर करण्यात यावा व जिल्ह्याभरात MREGS अंतर्गत कामे सुरु करुन मजूरांच्या हाताला काम देण्यात यावे, संपूर्ण जिल्ह्याभरात दुष्काळ पडलेला असून शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्यात यावे, अशा अनेक मागण्या महाविकास आघाडीने या निवेदनामार्फत केल्या आहेत.

शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले अनुदान बँका कर्जखात्यात जमा करीत असल्याने सदरील अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शासनाने याकडे तात्काळ लक्ष देवून अनुदान कर्जखात्यात जमा न करणेबाबत सर्व बँकाना आदेशित करावे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज वसुली तात्काळ थांबवून वीज खंडीत करण्यात येऊ नये.

जिल्हयातील अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे याबाबत शासनाने दक्षता घेऊन उपययोजना करावी, जिल्ह्यात दुष्काळ पडलेला असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीस माफ करावी. मोसंबी फळांची गळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून नुकसान अनुदान मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावे. व शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी सुद्धा चाऱ्याची व्यवस्था शासनाने करावी यासह विविध मागण्या घेऊन आज महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार सुरेश जेथलिया, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार बदनापूर आदींची उपस्थिती होती.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »