महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे मुख्य बातम्या

शिवसनेच्या वतीने एक हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण शिवसनेतर्फे एक हजार  पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून ही मदत नव्हे तर आमचे कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.जुलै महिन्यात कल्याण शहराला  पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. सतत कोसळणाऱ्या धुवांधार पावसाने कल्याण पश्चिम मधील मांडा-टिटवाळा,अटाळी,वडवली,घोलपनगर,भवानी चौक,गोविंदवाडी,रेतीबंदर येथील भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पूरुपरिस्थिती निर्माण झाली होती. घरात पाणी शिरल्याने  अनेकांचे नुकसान झाले आहे. घरातील सामान खास करून अन्नधान्याचे नुकसान झाल्याने गोरगरीब जनतेसमोर मोठी  समस्या निर्माण झाली होती. अशा वेळी आपले कर्तव्य म्हणून कल्याण शहर शिवसेना शाखेच्या वतीने या अडचणीच्या समयी पूरग्रस्तांना एक हात मदतीचा देण्यात यावा या उद्देशाने त्यांना अन्नधान्य तसेच  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कल्याण पश्चिम चे आमदार तथा शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला त्यांच्या उपस्थितीत आज मांडा-टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करून सुरुवात करण्यात आली. मांडा-टिटवाळा येथील सुमारे 250 जणांना,घोलपनगर,भवानी चौक येथील 450 जणांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वतीने तर अटाळी-वडवली येथील 450  पूरग्रस्तांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात आले.तर रेतीबंदर आणि गोविंदवाडी परिसरातील सुमारे 250 पूरग्रस्तांनाही शहर शाखेच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

मुसळधार पावसाने अनेकांचे खूप नुकसान झाले असून शासनाच्या वतीने त्याचे पंचनामे सुरू आहेत.अनेकांचे पंचनामे पूर्ण झाले असून काही थोडेच बाकी राहिले आहेत त्यामुळे शासनाची जी काही मदत असेल ती पूरग्रस्तांना मिळेलच परंतू शिवसेना हा समाजाभिमुख पक्ष आल्याने आमचे ही काही कर्तव्य आहे याचं भावनेने थेट पूरग्रस्तांना मदत मिळावी याच हेतूने ही मदत नव्हे तर कर्तव्य केल्याची भावना यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »