महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या शक्तींना आवर घालण्यासाठी कल्याणात सकल भारतीय समाजाचा महामोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/qsNTwQkQTlI

कल्याण/प्रतिनिधी – दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी यांच्यात दंगली करून सामाजिक वातावरण बिघडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्त करत आहेत . त्आयांना आवर घालण्रोयासाठी तसेच सर्व समाजात एकोपा राहावा.सर्वत्र शांतता राहावी.यासाठी कल्याणात सकल भारतीय समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला होता. कायदा व्यवस्था बिघडल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या आणि दंगलीचे मुख्य सूत्र धार शोधून गुन्हे दाखल करा अशा मागण्या यावेळी मोर्च्यात करण्यात आल्या. सकल भारतीय समाजातील मनात शासनाविरोधात असलेला राग व्यक्त करण्यासाठी कल्याणमध्ये सकल भारतीय समाजाच्या वतीने मंगळवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व समाजातील जनता हजारोच्या संख्येने सहभागी झाली होती.यावेळी आंदोलन कर्त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.

कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून प्रांत कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात समाजातील निरपराध तरूणांवर केलेल्या हल्ल्यातील आरोपीचा शोध घ्या, अत्याचार रोखन्यास असमर्थ ठरलेल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या आणि जातीय धार्मिक तेढ निर्माण करणार्याना शोधा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा.असा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून सुरवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, काळा तलाव, बेतूरकर पाडा, खडकपाडा मार्गे प्रांत कार्यालयात जाऊन धडकला. यावेळी, शिष्ट मंडळाने प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
ठाणे जिल्ह्यातील सर्व समाजातील अनेक संघटना एक भारतीय नागरिक म्हणून या मोर्चा सहभागी होते. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »