महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी चर्चेची बातमी

केळीची बिस्किटे बनविण्याचा शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – हल्ली शेती करणे फार अवघड झाले आहे, त्यामुळे अनेकजण जुन्या पद्धतीच्या शेतीला बगल देत नवी सांगड घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचबरोबर शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन शेती फुलवली जात आहे. जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्याने केळीवर प्रयोग करत आज केळीपासून तब्बल सहा उत्पादने तयार केली आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने केळीपासून बिस्किटे बनवण्याचा प्रयोग केला असून या उत्पादनाला पेटंट सुद्धा मिळाले आहे. एकूणच या शेती उत्पादनातूनच नवा मार्ग शोधत इतरांसाठी पर्याय उभा केला आहे. जळगाव जिल्हा कापूस आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणून ओळख आहे. केळी लागवड मोठ्या संख्येने होत असल्याने अनेकदा कवडीमोल भावातच केळी विक्री करावी लागत असल्याचे शेतकरी सांगतात. जळगाव जिल्ह्यातीलच यावल तालुक्यातील रहिवासी असलेले अशोक गडे यांनी मात्र हार न मानता यावर उपाय केला. आणि आज हीच केळी वेगवगेळ्या स्वरूपात महाराष्ट्रभर विक्री केली जात आहे. टॉफी, चिप्स, लाडू आणि आता बिस्किटाच्या स्वरूपात केळी बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत. याचं सर्व श्रेय अशोक गडे आणि त्यांच्या कुटुंबियांना जातं. गडे यांनी ही उत्पादने केळीपासून तयार करण्याचा उद्योग सुरु करत इतरांच्या हाताला देखील काम दिले आहे.

शेवटी अशोक गडे यांनी केळीच्या फळांवर प्रक्रिया करून उत्पादनाचे शेल्फ लाइफ वाढवण्याची कल्पना मांडली. केळीच्या चिप्स, जाम, कँडीज, पापड, चिवडा आणि लाडू यांसारखे केळीचे पदार्थ बनवतात. तर आता यात बिस्किटांची देखील भर पडली आहे. आणि यावर्षी एप्रिलमध्ये केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या केळीच्या बिस्किटांचे पेटंट दिले आहे. त्यामुळे एकप्रकारे केळीपासून नाविन्यपूर्ण स्वरूपात बिस्किटे बनविण्याचा निर्णय आज अशोक गडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांसह फायदेशीर ठरला आहे. विशेष म्हणजे 2010 पासून त्यांनी केळीवर प्रक्रिया करून इतर पदार्थ बनविण्यास सुरवात केली. मात्र त्यांना बिस्किटाचा प्रयोग सफल होण्यास नऊ वर्षांचा कालावधी लागला. परंतु आता प्रयोग सफल झाल्यानंतर अशोक यांना भरघोस नफा मिळत असून केळीचा पुरवठा करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना देखील यातून नफा मिळत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »