महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर

संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह यांचे निधन

जालंदर / प्रतिनिधी – संत निरंकारी मंडळाचे प्रधान तसेच मिशनचे समर्पित संत पूज्य गोबिन्दसिंहजी यांनी आज पहाटे ३.२० वाजता जालंदर (पंजाब) येथे निधन पावले. ते ८६ वर्षाचे होते.गोबिन्दसिंहजी, ज्यांना मोठ्या आदराने ‘भाईया जी’ म्हणत असत त्यांचा जन्म २० जुलै, १९३५ रोजी अविभाज्य हिन्दुस्थानातील झेलम जिल्ह्यामध्ये (आता पाकिस्तानात) झाला. त्यांच्या  तप-त्यागाने ओतप्रोत जीवन आणि असाधारण योगदान यांचे मिशनच्या इतिहासात सदैव स्मरण कले जाईल. बाबा गुरबचनसिंहजी यांनी तयार केलेल्या मंडळाच्या ५१ सदस्यीय वर्किंग कमेटीचे ते  संस्थापक चेअरमन होते. पुढे १९८७ साली बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी त्यांना संत निरंकारी मंडळाचे जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त केले. मिशनच्य वार्षिक संत समागमांचे चेअरमन म्हणून त्यांनी सदोदित आपल्या सेवा अर्पण केल्या. 

   गोबिन्दसिंह यांनी संत निरंकारी मंडळाचे विविध विभाग, जसे – जमीन खरेदी व भवन निर्माण, सामान्य प्रशासन व ब्रँच प्रशासन या सेवा गुरुमतानुसार मोठया सचोटीने पार पाडल्या.  त्यांनी आपल्या सर्व सेवा समर्पित भावनेने आणि भक्तिभावाने युक्त होऊन निभावल्या. संत निरंकारी मंडळाचे प्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते मिशनच्या केंद्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे प्रथम चेअरमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मागे दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.  त्यांच्या पत्नी चरणजीत कौर जी, या बाबा अवतारसिंहजी यांच्या कन्या होत्या.त्याचेही निधन झाले आहे.गोबिन्दसिंह यांनी आपल्या महान आध्यात्मिक जीवनाद्वारे मानवतेच्या सेवेमध्ये आपली एक अमिट छाप उमटवली असून येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी त्यांचे जीवन मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत्र बनून राहिली. त्यांच्या सेवांचे मिशनकडून सदैव स्मरण केले जाईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »