महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे मुख्य बातम्या

शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी वंचितच्या वतीने ठाण्यात धरणे आंदोलन

प्रतिनिधी.

ठाणे – केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात शेती संबधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत असलेल्या संख्या बळाच्या आधारावर मंजुर करुन घेतले.या नवीन विधेयकामुळे भारतीय शेतकरी अक्षरशः नागवला जाणार असुन तो देशोधडीला लागणार आहे. जागतिकिकरण आणि त्याचमागून अपरिहार्यपणे येणा-र्या खाजगीकरणातुन शेतक-र्याचा शेतमाल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा आणि त्याचबरोबर शेतक-र्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात आहे.अशा या अन्याकारक विधेयकाचा निषेध नोंदवित व या विधेयकाला विरोध म्हणुन दिल्ली येथे गेले अनेक दिवस शेतकरी बाधवाचे आंदोलन सुरु आहे . या आदोलानाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना धरणे आंदोलन करण्यासाठी आदेश दिला होता त्या आदेशानुसार ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनिल भगत व महिला जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. व ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला ठाणे जिल्हा सचिव रेखा कुरवारे , महासचिव जयवंत बैले,वी.प्रधान, भिमराव गायकवाड ,ठाणे शहर अध्यक्ष महेंद्र अंभोरे ,सुनिता रनपिसे ,मीना सोरटे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts
Translate »
×