महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी चर्चेची बातमी

गव्हाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नंदुरबार /प्रतिनिधी – शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो पण त्याच पोशिंदयावर आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे. सद्या राज्यात पडणारा अवकाळी पाऊस, बदलते हवामान या सर्वांचा विपरीत परिणाम पिकांवर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाने तर शेतकऱ्याला साथ दिली नाही आणि त्याने काबाडकष्ट करून पिकवलेल्या मालाला योग्य भाव सुद्धा मिळत नाही.

नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातील शेवटच्या टप्प्यातील गहू काढणीला सुरुवात झाली आहे. यावेळी अवकाळी पाऊस व पाण्याची कमतरता यामुळे गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यातच उशिरा निघालेल्या गव्हाला बाजारात समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी कमी पावसामुळे गहू लागवडीला उशिरा सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यात होत असलेली लागवड या वर्षी डिसेंबर महिन्यात करण्यात आली आणि यावर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात गहू पिकाचे नुकसान झाले व गव्हाचे क्षेत्र कमालिने घटले त्यामुळे फेब्रुवारीच्या महिन्यात निघणार गहू मार्च महिन्यात निघाला.

आधीच उशिरा निघालेला गहू आणि बाजार समितीत भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजार समितीत गहू येत नसल्यामुळे यावर्षी मार्केट उशिराने सुरू झाले. परंतु आधीच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गव्हाचे अतोनात नुकसान झाले व त्यातच बाजार समिती देखील गव्हाला पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतीसाठी लावण्यात आलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढतच चालली आहे.

Related Posts
Translate »