महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी महाराष्ट्र

अवकाळी पावसाचा पिकाला फटका,शेतकऱ्याची मदतीसाठी सरकारला हाक

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

यवतमाळ/प्रतिनिधी – यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी रात्री सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने एका रात्रीत शेतकाऱ्यांना देशोधडीला लावले आहे. अत्यंत मेहनतीने आणि कष्टाने पिकवलेले पीक जोरदार पावसात व्हावून गेले . हतबल शेतकरी काहीच करू शकले नाहीत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या या अवकाळी पावसामुळे कापूस, तीळ, मका आणि ज्वारी या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता, त्यातच मंगळवारी रात्री विजांच्या जोरदार कडकडाटासह हा मुसळधार पाऊस पडला.

सुदैवाने या अवकाळी पावसाने कुठेही जीवित हानी झाली नाही. मात्र नागरिकांची प्रचंड दाणादाण उडाली. प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारण शेती हीच शेतकऱ्यांच्या उपजीवेकेचे एकमेव साधन आहे.

आत्महत्येनंतर शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत जर पिकांचे नुकसान झाल्यावर तातडीने मिळाली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होईल. याची दखल सरकार ने घ्यायला हवी.

Related Posts
Translate »