महत्वाच्या बातम्या

मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्तलाखोंचा गुटखा जप्त मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरारटँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची मैलभर पायपीटफेक आंतरराष्ट्रीय फोन कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारने दिले निर्देशवीज कंत्राटी कामगार संघांचे ‘सरकार जगाव’ अभियान
Default Image ताज्या घडामोडी राजकीय

इंडिया आघाडी बैठकीचे वंचितला निमंत्रण कोणाच्या हाती पाठवले ? अंधारे यांनी स्पष्टीकरण द्यावे – शमिभा पाटील

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनिधी – नेहमीच आपल्या विविध वक्तव्याने चर्चेत असलेल्या सुषमा अंधारे ह्यांनी नुकतेच एक जाहीर वक्तव्यात वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण दिले होते असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शमिभा पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन युवक आघाडी यांनी आपले मत व्यक्त करत अंधारे यांना सवाल केला आहे.

शामिभा म्हणाल्या कि, कोणतीही बैठक असो, राजकीय घडामोडी किंवा चर्चा असतील तर त्यामध्ये पक्ष म्हणून एक अधिकृत निमंत्रण येणे गरजेचे असते. ते अधिकृत निमंत्रण इंडिया आघाडीने चर्चेसाठी वंचित बहुजन आघाडीला कोणाच्या हाती पाठवल आहे? याची नैतिक जबाबदारी घेत आपण जर स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. सुषमा अंधारे तुमचा राजकीय बैठकींना जाण्याचा अनुभव केवढा आहे, हे मला माहीत नाही. अशाप्रकारे अधिकृत निमंत्रण असल्याशिवाय असल्या चर्चांमध्ये सहभागी होता येत नाही. नाहीतर असं होईल “ताई आली आणि येऊन बसली”.

वंचित बहुजन आघाडी ही भाजपा विरुद्ध आहे. भाजपा विरुद्ध लढण्यासाठी तयार आहे. पण अशाप्रकारे वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीच्या बैठकीत बोलावलं गेलेलं नाही आहे. असे शामिभा म्हणाल्या.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »