महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

मुंबईतील आधार संरक्षण भिंतींच्या प्रश्नी वंचितची आमरण उपोषणाची हाक

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – मुंबईत डोंगर उतारावरील असलेल्या वस्त्यांमध्ये संरक्षक भिंती कोसळून मोठी जीवितहानी झाल्याच्या घटना ताज्या आहेत. विशेषतः भांडुप परिसरामध्ये बहुसंख्य भिंती या धोकादायक अवस्थेत असून त्या घरावर कोसळून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कित्येक कुटुंबे भीतीच्या छायेखाली जगत आहेत. काही ठिकाणी अशा भिंतींचा काही भाग कोसळल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. अशी माहिती वंचित कडून देण्यात आली.

या संरक्षण/आधार भिंतीचे दुरुस्ती व पुनर्बांधणी इत्यादी कामे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त व मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ तसेच जिल्हाधिकारी यानी समन्वयाने करणे गरजेचे होते. महापालिका प्रशासन व जिल्हा नियोजन अधिकारी यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा यासाठी सदरचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा यापूर्वी वंचित देण्यात आला होता असे असूनही या विषयाकडे प्रशासनाने सोईचे दुर्लक्ष केल्याने वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी दिनांक 17 पासून आमरण उपोषणाची हाक दिली आहे.
 
भांडुप "एस" वॉर्ड समोर हे आंदोलन होणार असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे."आधार भिंतींच्या कामाच्या बाबतीत प्रचंड गोंधळ असून बेफिकीर प्रशासनाच्या इच्छाशक्ती अभावी नागरिकांची फरफट होत आहे, लोक मृत्यूमुखी पडल्यावर प्रशासन जागे होणार का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईतील सर्व जीर्ण आणि धोकादायक भिंतीचे बांधकाम तातडीने करावे व त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, खाजगी-शासकीय असा भेद न करता सरसकट भिंतीचे बांधकाम हाती घ्यावे, झालेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट व उच्चस्तरीय चौकशी करावी,

आयआयटी मुंबई यांच्या सूचनेनुसार शासनाने यावर ठोस कृती कार्यक्रम निर्धारित करून होणारे अपघात रोखावेत. व नागरिकांचे पुनर्वसन SRA योजने अंतर्गत करण्यात यावे इत्यादी मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केलेल्या आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »