महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

महावितरणच्या कल्याण परिमंडलात अडीच महिन्यात १ लाख ७६ हजार तक्रारींचे निवारण

नेशन न्यूज़ मराठी टिम.

कल्याण/प्रतिनिधी – नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी  सरकारने ‘इझ ऑफ लिव्हिंग‍’ संकल्पना आणली आहे. यात वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानुसार ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासह सर्व सेवा तत्परतेने देण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडलाने गेल्या अडीच महिन्यात खंडित वीजपुरवठा, वीजबिल व इतर अशा १ लाख ७६ हजार ११० तक्रारींचे तातडीने निवारण केले आहे.

वीज ही मूलभूत गरज आहे. ही महत्त्वाची गरज भागवण्यासाठी ग्राहकांना फारवेळ लागू नये यासाठी ग्राहकांना नवीन वीजजोडणीसह सर्व सेवा तत्परतेने देण्यावर महावितरणचा भर आहे. कल्याण परिमंडलात मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रलंबित वीजजोडणी देणे, ग्राहकांच्या वीजपुरवठ्याच्या तक्रारी, वीजबिलाबाबतच्या तक्रारी, इतर तक्रारी निर्धारित कालावधीत निकाली काढण्याचे निर्देश दिले.

कल्याण ‍परिमंडलात खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्यात येत आहे. जून २०२३ पासून आतापर्यंत वीजपुरवठा बंदच्या १ लाख २६ हजार ४८१ तक्रारींचे निवारण करण्यात आले. वीजबिलाबाबतच्या ६३ हजार १८० आणि इतर सेवाविषयक ६ हजार ८१६ तक्रारी सोडवण्यात आल्या. अडीच महिन्यात एकूण १ लाख ७६ हजार ३७३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील १ लाख ७६ हजार ११० तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. तर उर्वरित २६३ तक्रारींचे प्राधान्याने निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

कल्याण मंडल एक कार्यालयांतर्गत प्राप्त ६५ हजार १०३ तक्रारींपैकी ६५ हजार २८, कल्याण मंडल दोन कार्यालयांतर्गत प्राप्त ३८ हजार ७३७ तक्रारींपैकी ३८ हजार ६७४, पालघर मंडलांतर्गत प्राप्त १९ हजार ७६१ तक्रारींपैकी १९ हजार ७२३ आणि वसई मंडलांतर्गत प्राप्त ५२ हजार ७७२ तक्रारींपैकी ५२ हजार ६८५ तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. मुख्य अभियंता औंढेकर हे वीज ग्राहकांच्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपायांबाबत नियमित आढावा घेऊन आवश्यक सूचना देत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »